नित्य करी जो गुरुस्मरण, गुरुस कसे त्याचे विस्मरण ।

श्री गुरु सेवेची घ्या रे आण, सापडेल गुरुकृपेची खाण|

या श्लोकांत गुरुचे महत्व व साधकाचे कर्तव्य वर्णन केले आहे.

गुरुचे स्मरण आपण नित्य नियमाने करीत गेलो तर गुरुला आपले विस्मरण होणार नाही. ते सतत आपल्यावर लक्ष ठेवून रहातात. आपणाला मार्गदर्शन करतात. गुरु सेवेचे व्रत घ्या शपथ घ्या तेथे तुम्हाला गुरुकृपेची खाण सापडेल.

तुम्हाला कल्पवृक्षाप्रमाणे गुरुंचा आशिर्वाद मिळेल.

गुरुकृपा ही सुवर्ण खाणच समजावी. जो नित्य नियमाने गुरुचे अनुसंधान ठेवतो, गुरुवर श्रद्धा ठेवतो त्याला गुरुकृपेची खाण लाभते.

म्हणूनच म्हणतात

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥

शरीर स्वास्थाासाठी शांत मनाची गरज आहे व शांत मनासाठी क्षमा हे उत्तम औषध आहे

हे ज्ञान जो देतो तो गुरु होय. एका दानशूरामुळे अनेक जण समाधानी होतात. एकाच्या चैनीत अनेकांचे पोट भरते असा हा दानशूर, दयाळू परमेश्वर पहाण्यासाठी गुरुभक्ती महत्वाची आहे.

तेव्हा गुरु आपणाला सांगतात – संतुष्ट करणारा एक बनायचे कां, याचना करणार्‍या अनेकत जावून बसायचे ते तुम्हा ठरवा.

Leave a comment