सुसंगती

माणसांची ओळख त्याच्या सोबतच्या मित्रांवरून होते, या अर्थाची इंग्रजी म्हण आहे. जगात सुष्ट, दुष्ट, चांगले-वाईट अशी माणसं असतात. समविचारी माणसांची मैत्री होते, असंही म्हणतात. खळांची व्यंकटी जावो, असं ज्ञानेश्वरांनी म्हटलं आहे. वाईट संगतीत वाईट गुण आपल्यात येण्यास वेळ नाही लागत. पण चांगलेपण येण्यासाठी श्रद्धा आणि काळ महत्त्वाचा असतो.

सुविचार

जशी झाडाला पाण्याची गरज असते, जशी लेकराला मायेची गरज असते तसेच मनाला सुविचाराची गरज असते. सुविचार आपल्या मनासाठी प्रेरणादायक असतात, सुविचार आपल्याला कमी शब्दात खुप महत्वाच्या गोष्टी सांगतात ज्या आपल्या जीवनाला अधिक उर्जावान बनवतात. जीवन जगावं कस हे शिकवतात, म्हणून नियमित सुविचाराचे वाचन व मनन केले पाहिजे. चांगले विचार जवळ असलेला मनुष्य योग्य तो निर्णय घेण्याची क्षमता ठेवतो, अशा निर्णयामधून त्या मनुष्यासोबतच समाजाचे सुध्दा हितच होते.

सुसंस्कार

’सुसंस्कारित मन जिवाला कोठेच भरकटू देत नाही. यासाठीच मुलांचे मन सुसंस्कारित करणे हे मोठ्यांचे, हिंदु धर्माचरण करणार्‍या लोकांचे, समाजाचे कर्तव्य आहे. देवाने दिलेली ही समष्टी सेवा आहे; पण हे समाजाला कळत नाही आणि तो भरकटलेल्या तरुण युवकांप्रमाणे दूरदर्शनाच्या, त्यातील अनावश्यक मालिका यांच्यात वहावत गेला आहे.

अभिप्राय

“सुसंस्कार-सुविचार-सुसंगती या तीन तत्त्वावर आधारित ही चिंतने खरोखरच विविध विषयांवर एक नवीन प्रकाश टाकत आहेत. आपल्या जीवनातील अनेक प्रश्नांचे आपणास नवीन पद्धतीने अवलोकन करण्यास भाग पाडते.”

श्री. सुभाष शाह- कराड

“फक्त आध्यात्म नव्हे तर जीवनातील अनेकविध गोष्टींबद्दल जे विचार मांडले आहेत ते सहजपणे अनुकरणीय आहेत. आपल्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी चिंतनाचे महत्व अधोरेखित होते.”

श्री. प्रसाद मेहता- सांगली

“नाम साधना आणि भक्तिमार्ग याच दोन गोष्टी या कलियुगात आपणास सुख, शांती आणि आरोग्य कमविण्यासाठी उपयोगि आहेत. पैसे हे केवळ एक साधन असून परमोच्च सुखासाठी पैसे आणि संपत्ती केवळ अपुरी ठरते. ही चिंतेने वाचून आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून गेला.”

प्रा.नर्मदा भट – मुंबई

“अनेक विचारसरणींचा अभ्यास करून त्यावर आपले स्वतःचे केलेले चिंतन आपणास “सर्वसमावेशक विचारच समाजाला संतुलित ठेवू शकतात” यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडते. सुदृढ समाजासाठी सुसंस्कार- सुविचार- सुसंगती ही त्रिसूत्री प्रत्येकाने अंगीकारली पाहिजे.”

श्रीमती. मंदा दोशी – पुणे

“अन्न- वस्त्र- निवारा या जश्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत तश्याच बापूजींनी सांगितलेली त्रिसूत्री आपल्या जीवनाला एक नवीन अर्थ प्राप्त करून देणारी खूप आवश्यक त्रिसूत्री आहे असे मला वाटते.”

श्री. अर्जुन शिरतोडे – कोरेगाव

“वैद्यकिय क्षेत्रात काम करताना, रूग्णांना आयुष्यभर सेवा देताना, सात्त्विक वृत्ताने केलेले जीवनाचे अवलोकन केवळ परमोच्च आनंद देवून जाते. इतरांच्या वेदना दूर करताना परमेश्वराला शरण जावून त्याची केलेली भक्ती म्हणजेच रुग्णसेवा होय, याचा प्रत्यय या चिंतनातून येतो.”

डॉ. सच्चिदानंद गोसावी – कोरेगाव

“सुखाचा शोध घेताना ईश्वराला शरण जाण्या व्यतिरिक्त दुसरा सुकर मार्ग नव्हे हे ही चिंतने वाचल्यानंतर अधोरेखित होते. सुखाची प्रचिती संपत्तीने नव्हे तर सुसंगतीने होते याची खात्री पटली.”

श्री. पोपटराव साबळे – कोरेगाव

“शिक्षक म्हणून कारकीर्द करताना अनेक प्रसंगात मुलांवर सुसंस्काराचे महत्व नेहमीच जाणवत होते. सुसंगती – सुसंस्कार- सुविचार ही त्रिसूत्री प्रत्येकाच्या आयुष्याला एक कलाटणी देणारी ठरेल असे मला वाटते. “

श्री. अरविंद किरपेकर – कोरेगाव

“आध्यात्मिक जीवनाचा कुटुंबावर होणार परिणाम पिढ्यानपिढ्या टिकणारा आहे. घरातील वडीलधारया व्यक्तींचे आचरणच पुढील पिढीवर खरे संस्कार करत असते. म्हणुन अध्यात्माचे संस्कार प्रत्येक घरत खूप गरजेचे आहेत.”

श्री. अनिल भंडारी – कोरेगाव

बापूजीं बद्दल थोडेसे

बापूजी म्हणजेच डॉ. प्रकाश भंडारी, एक असे व्यक्तिमत्त्व ज्यांनी वैद्यकशास्त्र आणि आध्यात्म यांचा समतोल ठेवून आपले जिवन रुग्णसेवेत आणि समाजकार्यात वाहून दिले.
त्यांच्या प्रतिभेवर त्यांचे काका शांतीलाल भंडारी, जैन मुनी भद्रगुप्त महाराज, ब्रह्म चैतन्य श्री गोंदवलेकर महाराज यांच्या विचारांचा / शिकवणीचा खूपच पगडा आहे.

चिंतने

याची देहि याची डोळा पाहिन मी मरणाचा सोहळा

जीवनात अनेक सोहळे आपण अनुभवतो. सोहळा याचा अर्थ कार्यक्रम, नातेवाईक मित्रमंडळी एकत्र येऊन जो कार्यक्रम होतो, त्याला सोहळा म्हणतात. जसे नामकरण सोहळा, मुंज सोहळा, लग्न सोहळा, पदवी दान सोहळा, सुवर्ण…

जेष्ठ नागरिक हे संस्काराचे विद्यापीठ

प्रपंचात जेष्ठता येणे ही श्रेेष्ठतेची खुण आहे. बालकाला छोटा शिशु, मोठा शिशु, प्राथमिक, माध्यमिक, उच्चमाध्यमिक, कला, विज्ञान, व्यापार यामध्ये शिक्षण घेत घेत या शिक्षणाचे जे उच्च ठिकाण विद्यापीठ त्यामध्ये प्रवेश…

आई म्हणून जगुन बघ

आईची महती, तिचे कष्ट कसे अनमोल आहेत हे जाणवून देणारी ही कविता आहे. आई म्हणून जगून बघ थकत नाही कधी, तरी ती निवांत, तिला बसवून बघ, दोन शब्द बोल प्रेमाचे,…

संकल्प

आज एक एप्रील नविन वर्षाचा पहिला दिवस. या प्रथमदिनी नवीन संकल्प करुया, खोटं नाही बोलत खरचं सांगतो, प्रत्येकाने एक झाड लावून एप्रिल कुल करुया. हा विचार नवा आहे. कल्पना पण…

नवीन ब्लॉग अपलोड केल्यावर अपडेट प्राप्त करा