पर्युषण पर्वातील दिनचर्या

पर्युषण पर्व हे आठ दिवसाचे असते. या पर्वामध्ये साधकाने पुढीलप्रमाणे दिनचर्या ठेवायची असते.

सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होवून देवसा प्रतिक्रमण करावे. सूर्योदया नंतर 48 मिनिटांनी नावकरशी करावी. मुखात पाणी घ्यावे.

नंतर स्नान वगैरे करुन मंदिरात भगवंताचे दर्शन, पूजन, पठण करावे. आचार्य भगवंत असतील त्यांचे दर्शन व आशिर्वाद घ्यावा.

त्यानंतर गुरुभगवंतांचे प्रवचन एकावे नंतर आपल्या विहीत कामाला लागावे.

या आठ दिवसाचे काळात रोज छोटा मोठा एकदा नियम घ्यावा व दिवसभर त्याची जाण ठेवून तो पाळावा.

सायंकाळी सूर्यास्तयापूर्वी भोजन करावे. शक्य झाल्यास उकळून थंड केलेले पाणी वापरावे. रात्री भोजन त्याग करावा.

सांयकाळी राई प्रतिक्रमण करावे.

दिवसात एक किंवा दोन सामाईक करावेत. त्यात चिंतन मनन-पठण असावे.

रात्री मंदीरात दर्शनासाठी जावे.

भगवंताची केलेली आरास पहावी.

भक्तीने भगवंताचे गुण गावेत.

सर्वजण एकत्र झाल्यावर आरती करावी.

भक्तांनी आपली भावना व्यक्त करणारी स्तवने म्हणावीत. अशा प्रकारे सकाळपासून सायंकाळ पर्यंत प्रभुचे सानिध्यात दिवस घालवावा.

ज्याला शक्य असेल त्याने उपवास, एकाशन, बीयासण अशी तपे करावीत.

याप्रमाणे दिनचर्येतून साधकामध्ये अमुलाग्र बदल घडतो. जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलून जातो.

धर्मज्ञान, धमदर्शन व धर्मानुसार वागण्याची सवय लागते.

या पर्वाचे हेच महत्वाचे कार्य आहे.

तेव्हा प्रत्येक साधकाने या दिनचर्येचा विचार करुन आपली दिनचर्या आचरावी.

चोवीस तिर्थंकर भगवंत आपल्या पाठीशी आहेत याची मनांत आठवण ठेवावी.

Leave a comment