कर्म कसे करीत रहावे

जन्मापासून प्राणीमात्र सतत काही ना कही कर्म करतच असतो. कर्मा शिवाय तो राहूच शकत नाही.

कर्माचा सिद्धांत आहे तो असा, कर्माचे फळा हे कधी न कधी माणसाला भोगावे लागते .

जसे जमिनीत आपण बीजाची पेरणी करतो व काही दिवसानंतर त्याचे पीक घेतो. त्याप्रमाणे आयुष्यात जे जे चांगले बी आपण पेरतो त्याची चांगली फळे आपणास याच जन्मात चाखायला मिळतात.

काहींना ती पुढील जन्मात मिळू शकतात. मात्र कोणतेही कर्म हे फळ दिल्याशिवाय राहू शकत नाही.

तेव्हा हे कर्म कसे करावे?

दिवसभरात आपण खूप खूप कर्म करीत जातो, तेथे विचार करायला आपणाला वेळ नसतो. ती कर्मे तराजुच्या एका किंवा दुसर्‍या पारड्यात पडत असतात. त्याचा लेखा जोखा परमेश्‍वरापाशी असतो. तेव्हा या कर्माचा हिशेब ठेवणारा सी.ए./अकौंटंट यांच्याकडे सर्व लेखा जोखा सुपूर्त करणे आपले काम आहे.

जीवन जगत असताना कर्म करा. त्या शिवाय तुम्ही राहू शकत नाही. मात्र केलेली बरी वाईट कर्मे ही परमेश्‍वरालाच अर्पण करा. ती स्वत:कडे ठेवू नका.

त्या कर्माचा मालक स्वत: होवू नको. तरच तुम्हला न मागता तुमच्या कर्माचा लाभांश मिळत राहील.

कर्म करीत असताना विवेक बुद्धी जागृत करा. चिंतन मनन करा. यातून तुमच्याकडून घडलेल्या पापांचा हिशेब तुमच्या समोर येईल. तो तुम्ही गुरु भगवंत, आचार्य यांचे समोर ठेवा ते त्यांचे ज्ञानाने तुम्हाला जी अलोचना सांगतील ती तुम्ही करा.

मन, वचन, काया याकडून कळत न कळत झालेल्या अपराधाची क्षमा याचना करा व इतरांना पण क्षमा प्रदान करा आणि शांत जीवन जगा…

Leave a comment