ठेऊ कसा हिशोब?
जीवनांत अशी संभ्रम अवस्था प्रत्येकाला येते. खूप कामे करायची असतात. प्रत्येकाला गरजेप्रमाणे अर्थसहाय्य करावयाचे असते. कुणाला उसने, कुणाला व्याजाने, कुणाला गहाण स्वरुपाने असे आर्थिक सहकार्य केले असते.
या सर्व कारभारात आपल्यालाच कळत नाही. आपल्याकडे किती होते, किती आहेत व किती पुढे मिळतील.
ही जीवनातील संभ्रम अवस्था समोर ठेवीत एक कविता माझ्या समोर आली.
हिशोब काय ठेवायचा ?
पाण्याचे उदाहरण – काळाच्या निरंतर वाहत्या प्रवाहामध्ये आपल्या थोड्या वर्षाचा हिशोब काय ठेवायचा?
आयुष्याचा विचार करता – आयुष्य भरभरुन दिले असतांना जे नाही मिळाले त्याचा हिशोब काय ठेवायचा ?
मित्रांचा विचार करता – मित्रांनी दिले आहे, अलोट प्रेम ईथे, तर शत्रुच्या बोलण्यांचा, हिशोब काय ठेवायचा?
दिवसाचा विचार करता – येणारा प्रत्येक दिवस आहे प्रकाशमान इथे, तर रात्रीच्या अंधाराचा, हिशोब काय ठेवायचा?
आनंदाचा विचार करता – आनंदाचे दोन क्षण ही पुरेसे आहेत जगण्याला, तर मग उदासिनतेच्या क्षणांचा, हिशोब काय ठेवायचा?
फुलांचा विचार करता – मिळाली आहेत फुले ईथे कितेक सहृदांकडून, मग काट्यांच्या टोचणीचा हिशोब काय ठेवायचा ?
चंद्राच्या प्रकाशाचा विचार करता – चंद्राचा प्रकाश आहे, जर ईतका अल्हाददायक तर त्या वर डाग आहे, त्याचा हिशोब काय ठेवायचा?
आठवणीचा विचार करता – जर आठवणीनेच होत असेल, मन प्रफुल्लित, तर भेटण्या न भेटण्याचा, हिशोब काय ठेवायचा?
चांगलेपणाचा विचार करता – कांही तरी नक्कीच, खूप चांगले आहे सगळ्यामध्ये
मग थोड्याशा वाईटपणाचा, हिशोब काय ठेवायचा?