स्त्री शक्तीचे जागरण

जागरण म्हटले की प्रदर्शन समोर येते.

कुठलेही प्रदर्शन असलं तरी त्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. प्रसिद्धी करावी लागते.

अशाच एका जागरणाचे (प्रदर्शनाचे) आज आपण जाणून घेणार आहोत.

समाजामध्ये अनेक शक्ती नेहमी कार्यरत असतात. त्या शक्तींना आपले कुलदैवत मानुन समाजामध्ये त्या शक्तीचे पूजन केले जाते.

अशा शक्तीमध्ये स्त्री शक्ती महत्वाची सांगीतली आहे. असेही म्हटले जाते की यशस्वी पुरुषाचे पाठीमागे स्त्री चा मोठा सहभाग असतो.

जसे देव पुरुष शक्तीचे प्रदर्शन करतात. तसे देवीद्वारे स्त्री शक्तीचे प्रदर्शन केले जाते.

आपल्या या विशालकाय देशामध्ये काश्मिर पासून कन्याकुमारी पर्यंत अशा देवी, स्त्रि शक्ती कार्यरत आहेत.

या सर्व शक्तीमध्ये मानवताभाव भरलेला असतो. प्रदेश, ठिकाण यावरुन त्यांचे नावामध्ये फरक केलेला असतो.

काश्मिरपासून कन्याकुमारी पर्यंत अशा स्त्री शक्ती पसरलेल्या आहेत.

1. वैष्णवदेवी,

2. दुर्गादेवी,

3. मुदाईदेवी,

4. जनाईदेवी,

5. महालक्ष्मी देवी,

6. यमाईदेवी,

7. राधा,

8. सरस्वतीदेवी,

9. पार्वती देवी,

10. सीतादेवी,

11. शांतादेवी,

12. पद्मावतीदेवी,

13. लक्ष्मीदेवी,

14. यल्लमादेवी,

15. सावित्रीदेवी,

16. मदर तेरेसा,

17. सुधा मुर्ति

अशा शक्तीशाली स्त्रियांचे चारित्र व शक्ती लोकांचे समोर ठेवणे हे स्त्री शक्तीचे जागरण करणे होय.

आपल्या सर्व शक्तिने , भक्तीने, प्रेमाने  स्त्री प्रपंचात स्वत:ला वाहून  घेते व दोन्ही घरांची किर्ती वाढविण्याचा प्रयत्न करते.

तेव्हा तिच्या शक्तीचा आदर प्रपंची माणसाने ठेवणे गरजेचे आहे.

हल्ली राजकारणामध्ये पण ही शक्ती प्रवेश करु लागली आहे.

पण मला वाटते स्त्रीने आपल्या शक्तीची परिक्षा मनात करुन अगर अहंकार व हक्क म्हणून घर सोडून समाजकारणामध्ये भाग घेण्याचा प्रयत्न करु नये.

मात्र तिच्या शक्तीचा पाठींबा देत रहावा. हेच स्त्री शक्तीचे जागरण होईल.

Leave a comment