संतांची लक्षणे ओळखणे हे मोठे विवेकाचे काम आहे. संत हे सामान्य साधकाप्रमाणे समाजात वावरत असतात.
माणसातील सर्व लक्षणे त्यांच्यात दिसतात. जगण्यासाठी लागणार्या अन्न – वस्त्र – निवारा या गोष्टींची त्यांना गरज असते व त्या गोष्टी त्यांना उपलब्ध होतात.
मग सामान्य साधक व संत यांच्यात फरक कोठे दिसतो ? खूप चांगला प्रश्न आहे…
संतांच्याकडे जर आपण पाहिले तर त्यांचे मध्ये काम, क्रोध, मद, मोह, मत्सर यांचेवर ताबा दिसून येतो.
ते कोणत्याही गोष्टींवर आकर्षण ठेवून वागत नसतात.
जे मिळेल ते व जिथे मिळेल तेथे ते आसरा घेऊन रहातात.
त्यांना पैशाची, सत्तेची, मानसन्मानाची हाव दिसत नाही.
ते आपले विहित कार्य संपले की त्या ठिकाणाहून दुसर्या ठिकाणाकडे प्रयाण करतात.
त्यांना कुणी वंदा अगर कुणी त्यांची निंदा करा काही फरक पडत नाही.
ते निस्पृहि असतात. जीवनातील त्यांचे ध्येय निश्चीत झालेले असते. त्या ध्येयावर श्रद्धा ठेऊन भक्तीने, प्रेमाने ते ध्येय पूर्तीचा प्रयास करीत असतात.
त्यांचे बोलणे सुमधूर असते. त्यांचे वतिने कुणाला दुखविले जात नाही.
ते सत्य वचनी असतात. त्यांना आपले वैभव – ज्ञान इतरांना दाखविण्याची इच्छा नसते.
ते इतरांना सुधारणे ऐवजी स्वत:ला परमार्थ मार्गात नेण्याचा प्रयत्न करतात.
संतांचा आहारावर प्रचंड ताबा असतो.
नियमित व संतुलीत आहार ते घेत असतात. कधीही टिका, टिपणी करुन समोर आलेले भोजन घेत नाहीत.
त्यांचे दृष्टीने ‘अन्न हे परब्रम्ह’ असते.
एकलाच मी जातो असे म्हणत ते जीवन जगत असतात.
कुणावर ते अवलंबून रहात नाहीत. अशा या संतांचे भोवती साधकांची सतत गर्दी असते.