संपत्ती व संस्कार ही जोडी आहे जशी शेतकर्याची ढवळ्या-पवळ्याची जोडी. ही जोडी जर सुदृढ असली तर शेतकरी सुखी होवू शकतो व जर त्या जोडीमध्ये काही अजोड संबंध आले तर सर्व कालचक्र, प्रपंच चक्र उलट फिरु लागते.
पैशाने माणूस श्रीमंत बनतो. सोने, चांदी, हिरे, रत्ने, गाड्या, घरे घेवू शकतो. संपत्तीच्या जोरावर किर्तीच्या उच्चपदापर्यंत जाऊ शकतो. पण ही संपत्ती प्रपंचिका मथ्ये अहंकार उत्पन्न करु शकते. आपल्यासारखा श्रीमंत कोणी नाही, असा त्याचा समज होतो व तो इतरांवर अहंकाराने सत्ता गाजविण्याचा प्रयत्न करतो. ही झाली एक बाजू.
आता दुसर्या बाजुचा विचार करु अशा श्रीमंत माणसाजवळ जर घरातील वडीलधार्या माणसांचे चांगले संस्कार असतील, त्यांचे मार्गदर्शन असेल तर दूध में शक्कर या न्यायाने सर्व चांगलेच होत जाते. तो स्वत:चा प्रपंच चांगला करु शकतो व तो प्रपंच चांगला करीत करीत इतरांना मदत करु शकतो. इतरांच्या अडीअडचणीत सहभाग घेऊ शकतो.
अशा प्रमाणे ज्या वेळी असलेली पैशाची संपत्ती संस्कारक्षम माणसाला लाभते. त्यावेळी तो माणूस रतन टाटा सारखा दयाधन होवून दीन दुबळ्या गरजुंसाठी आरोग्य रक्षणासाठी रुग्णालये उभा करु शकतो. अनेकांचे आशीर्वाद घेऊ शकतो.
हा संपत्ती व संस्कार यांचा सलोखा आता संस्कार चांगले आहेत, वर्तणूक चांगली आहे, पण खिशात एक दमडीपण नाही. सायंकाळी काय खायचे याची ज्याला खंत आहे, ते कंगाल असून देखील परमेश्वर भक्तीत गुंग आहे. आपल्या संस्काराला विसरत नाही. त्याचे मदतीला परमेश्वर धावून येतो त्याला त्याच्या अवघड वेळी मदतीचा हात देतो.
अशा वेळी लक्षात येते की, संपत्ती व श्रीमंती या दोन्ही गोष्टी जरी मोठ्या असल्या तरी त्यांची सोबत चांगल्या संस्कारक्षम माणसाशी होणे गरजेचे आहे.
प्रत्येकाचे आयुष्यात जेव्हा ही जोड गोळी एक दिलाने काम करते, त्यावेळी त्याचा प्रपंच आनंदात चालत असतो.
प्रपंच अशा प्रकारे आनंदी, समाधानी चालावा म्हणून या गोष्टी एकत्र असणे किंवा एकत्र नसणे हे महत्वाचे नसून ज्याच्या ठिकाणी त्यांचा मेळ आहे अगर मेळ नाही अशा मानवी मनाचा समतोल तेथे असणे गरजेचे आहे.
विवेक ही गोष्ट या ठिकाणी दोघांचा मेळ घालणारी बाब आहे. विवेक म्हणजे विचार, चिंतन, मनन.
कशाला महत्व द्यायचे व कशाचा मोह कमी करावयाचा याचा विचार ज्याच्या ठिकाणी येतो, तो संपत्ती व संस्कार यांची जोडी जमवतो व जीवन आनंददायी बनवितो.
तसे आपण बनवावे ही इच्छा..
1 Comment
सौ. शीला केतकर
साधनेमध्ये जर चांगल्या व्यक्तींची संगत असेल तर साधना निश्चितच परिपूर्ण होते.
साधनेमध्ये निगेटिव्ह विचाराच्या व्यक्ती नसाव्यात.
आपण म्हणता त्याप्रमाणे संसार करत असताना सुद्धा आपली पत्नी मुले यांचे उत्तम संगत असेल तर संसार परिपूर्ण होतो👍
🙏 राम कृष्ण हरी🙏