माणूस हा स्वत: बुद्धीवान समजला जातो.
जगातील निरनिराळ्या गोष्टींची तो शेवटपर्यंत ओळख करुन घेतो. मोठ मोठ्या व्यक्तींच्या ओळखी करुन घेणे त्यांचे संपर्कात रहाणे, हा काही लोकांचा छंदच असतो.
पण स्वत:चे मनात काय चालले आहे हे वाचणे जगातील सर्वात कठीण काम आहे.
हे गुढ काम करण्यासाठी कांही गुढ व्यक्तीच असाव्या लागतात.
त्यामध्ये साधू संत येतात, गुरुजन येतात, मायबाप येतात. यांचे गुरुकूलात जो जातो, त्यांचे सानिध्य संपादन करतो, खोलवर चिंतन करतो, तोच मनाच्या गुहेत काय विचार चालले आहेत याचे वाचन करु शकतो.
इतरांना ते वाचन करणे शक्य नसते.
जगातील ही सर्वात अवघड गोष्ट आहे. माणूस 18 पुराणाचे वाचन करील, रामायण – महाभारत वाचेल, समर्थांचा दासबोधाचे पारायण करेल, ज्ञानेश्वरीचे पारायण करेल पण या सर्वांमध्ये मी आहे याचे त्याला कधी दर्शन होत नाही.
स्वच्या अभ्यासकाला एकांताची गजर असते मोठ्या ग्रंथांची नाही. प्रसन्न मनाची गरज असते, म्हणून म्हटले आहे. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण ।
यासाठी देवाचिये दारी उभा क्षण भरी. त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात. तोच खरा स्वत:ची ओळख करुन घेण्याच्या परीक्षेत उत्तम गुण संपादन करुन उत्तीर्ण होतो.
ही ओळख होण्यासाठी वयाची अट नाही. गरीबी श्रीमंती, जाती धर्म सज्ञान, अज्ञान या कोणत्याही गोष्टीची गरज नाही. फक्त मनामध्ये शिरण्याचा भाव असणे गरजेचे आहे.
जेव्हा लक्ष्मण भ्रम निद्रेत गेले तेव्हा तो भ्रम नष्ट करण्यासाठी जी वनस्पति असाध्य पर्वतावर होती ती आणण्याचे काम रामाने मारुतीवर सोपविले. मारुती हा शिकलेला नव्हता, वनस्पति कोणती हे तो जाणत नव्हता. पण त्याने मनन केले तेथे त्याच्या ठायी असलेल्या अद्भूत शक्तीचे प्रदर्शन त्याला झाले. त्याने द्रोणागिरी पर्वतच करंगळीवर उचलून आणला.
ही स्वत:ची ओळख गरजेची आहे.