जन्म घेतलेल्या प्रत्येक जीवाला मृत्यू हा अटळ आहे. जन्म कोणत्या कुळात घ्यायचा हे माहित नसते तसे मृत्यू केव्हा येणार हे पण माहित नसते.
मात्र मृत्यू ही प्राण्याच्या जीवनाची शेवटची गती असते.
नोकरी करणार्या सेवकाला नोकरी लागल्यानंतर बदली ही असतेच. काहींना बढती मिळते. काहींना शिक्षा म्हणून मिळते. मृत्यू हा त्याच प्रकारात मोडतो.
मृत्यू ही आयुष्यातील बदली आहे.
माणूस प्रपंच करीत असताना सुरवातीच्या काळामध्ये खेडेगावांत शेतात पत्र्याचे शेड बांधून घर करतो. पुढे शहरात नोकरी करता करता तो चांगल्या पदावर जातो. तेथे मोठा तीन रुम-किचनचा फ्लॅट घेतो. त्याच्या चांगल्या कर्मामुळे त्याची बदली शेतातील घरातून शहारातील फ्लॅटमध्ये होते.
येथे आपण दु:खी होतो का? उलट आनंदाने सर्वांना सांगतो, मी झोपड्यातून फ्लॅटमध्ये रहावयास गेलो.
मृत्यू ही अशीच प्रक्रिया आहे. तेथे तुमचे कर्म-पुण्य व त्याचा चांगला साठा असेल तर तुम्हाला उत्तम गती प्राप्त होईल.
मात्र प्रापंचीक स्वत:च्या स्वार्थासाठी ती व्यक्ती आपणापासून दूर जाऊ नये म्हणून किंवा गेली म्हणून शोक, दु:ख करीत बसतो. हे दुर्दैव आहे.
आपण जसे सुवर्ण अलंकार गहाळ होवू नयेत म्हणून ते न वापरता बंद तिजोरीत ठेवतो व आनंदात असतो. तसे हे मिळालेले जीवन आपण न उपभोगता बंधनात गुंतवून ठेवतो.
मृत्यू हे सत्य आहे. जीवन असत्य आहे. पण जीवन जगत असताना आपण मृत्यूला कधी पहातच नाही. आपण कायम स्वरुपी जगणार असाच ग्रह आपण करुन घेतो.
हा भ्रम फार काळ टिकत नाही. कर्म गती अगाध आहे. एक न एक दिवस प्राण्याला मृत्यू कवटाळतो व तेथे प्राणी हळहळतो, दु:ख करतो, दु:खाबरोबर भिती समोर येते व ती भिती आयुष्यातील सर्व आनंदावर दु:खाची छाया पसरवितो.
त्यामुळे मृत्युकडे बघण्याचा दृष्टीकोन आपण बदलला पाहिजे.
जन्मला आलेला प्राणी एक न एक दिवस मृत्यू पावणार हे सत्य आहे. तेव्हा हे सत्य सतत डोळ्या समोर ठेवून जीवनाचा आनंद घ्या.
मृत्यूला भिऊ नको, धीटाईने सामोरे जा. सर्वांशी प्रेमाने वागा, सर्व प्राणी मात्रांची रोज क्षमा याचना करा.
सर्वांना माफ करा व मुखी अखंड नम ठेवा.
त्यामुळे मृत्यूमुळे येणारा गती पुनर्जन्मात उत्तम असेल. पुनर्जन्म टाळण्यासाठी मृत्युचे भय टाळा.
मोक्षाची वाट धरा. स्वत:च्या डोळ्यांनी मोक्ष कल्याणक पहा.