मरणात खरोखरच जग जगते

परवा एकदा मी एका अंत्यसंस्कार विधीला गेलो अंत्यसंस्कार विधी झाल्यानंतर जमलेली मंडळी श्रद्धांजली देवू लागली. एक एक करीत अनेकांनी त्या व्यक्तीचे गुण गाईले अनेक पैलू लोकांचे समोर आणले त्याचा जीवन प्रवास कसा अविस्मरणीय झाला ते सांगत होते.

थोडक्यात सर्वांनी त्या व्यक्तीला अमर करुन टाकले तेव्हा विचार माझ्या मनी आला या माणसाचे कर्तृत्व त्याचे जिवंतपणात आपणास कां कळले नाही ?

तेथे मला भा.रा. तांबे यांची कविता आठवली ते म्हणतात –
मरणात खरोखर जग जगते – याचा अर्थ जर माणसाला अमर व्हायचे असेल तर त्याला आगोदर मरण (कष्ट) भोगावे लागतात. धडपड त्याग करावा लागतो. मग अमरत्व येेते.

अशा व्यक्ती लोकांचे नजरेतून कधी जात नाही, अमर होतात.

ज्याप्रमाणे काट्याने काटा काढतात त्याप्रमाणे अमर होण्यासाठी अनंत मरणे मरावी लागतात. अनेक कष्ट उपसावे लागतात. प्रपंचात पण जो ‘‘स्व’’ चे दान करतो त्याचे घरी सर्व गोष्टी आपोआप येतात. ज्याला जगायचे आहे अमर व्हायचे आहे त्याने या जीवन यज्ञात स्वत:च्या सर्व इच्छा, आकांक्षा भावनांचे हवन करावयाचे असते.

आनंदी जीवन जगत अमर होण्याचा एकच मार्ग म्हणजे दुसर्‍यासाठी कष्ट करा. दुसर्‍यासाठी मरा तरच तुम्ही जगाल.

पुराणात आपण पहातो सीतेने सात्विकता दाखविलेसाठी आदर्श राखण्यासाठी अग्नीमध्ये अग्नी परीक्षा दिली.

निसर्गात सुर्य पण रात्रंदिवस धगधगत सर्व पाश छेदीत नव किरणांचे साह्याने अंधार नाहीसा करतो व पृथ्वीवर अमर होतो.

त्याला पण रात्रीच्या मरणात स्वत:ची अहुती द्यावी लागते. सोन्याची झळाळी दिसण्यासाठी सोन्याला पण अग्नी परीक्षा द्यावी लागते.

हा नियतीचा नियम आहे. तेव्हा विवेकानंद म्हणतात “उठ जागा हो, आळस त्यागुन देशासाठी गर्जना कर. जगु अथवा मरु, मरु तर देश तारु” याप्रमाणे त्यांनीपण मरणात जग जगते हे अर्जवून सांगितले आहे.

यासाठी विसरा (मरा) आणि माफ करा (क्षमावृत्ती) हे तत्व केव्हाही श्रेष्ठ होय.

ग्रंथांचे वाचन झाल्याशिवाय संत समजणार नाहीत आणि संत होवून गेल्याशिवाय भगवंत दिसणार नाही.

दुसर्‍यासाठी “मरा” स्वत: अमर व्हा.

1 Comment

  • शीला केतकर
    Posted October 12, 2022 11:47 am 0Likes

    🙏
    खरोखर माणसाने केलेले कर्तृत्व आणि त्यांचे गुण हे, मनुष्य जरी गेला तरी टिकून राहतात आणि आणि त्याचीच कीर्ती राहते तेच अमर होतात.
    अगदी खरे आहे मरणात खरोखर जग जगते.
    🙏 राम कृष्ण हरी🙏

Leave a comment