मनुष्य जन्मा तुझी कहाणी

या जगात प्रत्येक माणूस वेगळा आहे. त्याची विचारसरणी वेगळी आहे. माणसा माणसामध्ये भेद आहेत. ते भेद शिगेला जातात व संबंध तोडण्याची भाषा बोलतात.

तेव्हा माणसा, नातं कोणतेही असो मतभेद कितीही असो संबंध तोडण्याची भाषा कधी करु नकोस.

प्रत्येक माणूस वेगळा, विचार सरणी वेगळी, मनुष्य जन्म तुझी कहाणीच आगळीवेगळी.

जसे बापासारखा मुलगा नसतो, मुलासारखी सून नसते, नवरा आणि बायको यांचे तरी कुठे एवढे पटते?, जरी नाही पटले तरी गाडी हाकायची अबोला धरुन.

विभक्त होवून सारीचं गणितं चुकायची.

तेव्हा लक्षांत ठेव काही धरायचं असतं, काही सोडायचं असतं. एखाद्या वेळी बिनसतं, म्हणून एकमेकाला सोडायचं नसतं.

चुकल्यावर बोलावं, बोलल्यावर ऐकूण घ्यावं, एकांतात बसल्यावर अंत:रंगात डोकवाव (चिंतन करावं) राग मनांत ठेवला म्हणून कुणाचं भलं झालं का?

(क्रोध) बिन सावलीच्या झाडा जवळ पाखरु कधी आलं का?(तिरस्कार)

समोरची व्यक्ती चुकली तरी प्रेम करता आलं पाहिजे. झालं गेलं विसरुन जावून, गच्च मिठी मारली पाहिजे. (क्षमा)

स्वागत होईल न होईल, जाणं येणं चालू ठेवा. (मानापमान)

समोरचा जरी चुकला तरी म्हण, खुशाल ठेव देवा.

तेव्हा माणसा नात्यापेक्षा दूसरं काही मोठं नाही.

आपलं माणूस आपल्यापाशी या सारखी श्रीमंती नाही.

विसरु नको माणसा, तुझ्या जन्माची ही कहाणी.

Leave a comment