मानवी जीवन – आनंदाचा अमुल्य ठेवा

ठेवा म्हणजे साठवण – ती पैशाची असो वा आनंदी क्षणांची असो तो एक अमर्त्य असा ठेवाच आहे.

तो ठेवा प्रत्येकाचे अंत:करणात असतो. आपण मात्र तो इतरत्र शोधत असतो. आपल्या अज्ञानामुळे आपण अंधकारात तो इतरत्र चाचपडत असतो.

हा ज्ञानाचा ठेवा (खजीना) शोधण्यासाठी ज्ञानाची विज्ञानाची, विवेकाची गरज भासते. मानवाने निरनिराळ्या क्षेत्रात जावून ज्ञान मिळविले. अशक्य अशा गोष्टी शक्य केल्या. तेथे ज्ञानाची मंदीरे खुली केली.

त्यातून त्याची आर्थिक, भौगोलिक भूक भागली. पण त्यात त्याला स्वास्थ मिळेनासे झाले. पुन्हा पुन्हा तो अहोरात्र कष्ट करु लागला. अनेक विद्यांचा अभ्यास करु लागला. पदव्या मिळवू लागला. त्या पदव्यातून त्याला अहंकार चिकटला. माझ्या सारखा विद्वान कोणी नाही अशी ग्वाही तो इतरांना देवू लागला.

अज्ञानामुळे त्याला मिळालेल्या ज्ञानचे साईड इफेक्ट्स त्याचे ठिकाणी दिसू लागले.

तो भ्रमात गुंतला – एखाद्या गोष्टीचे
अज्ञान,ज्ञान,आत्मज्ञान किंवा संपूर्ण ज्ञान नसणे म्हणजे अज्ञान होय.

काहीजणांना एखाद्या गोष्टीचे सर्व पुस्तकी ज्ञान असते. पण व्यवहारात त्या ज्ञानाचा उपयोग कसा करावयाचा ही कला त्याचे जवळ नसते. हा ज्ञानाचा अभाव झाला.

अशा वेळी विवेकी माणसाने ज्ञान व अज्ञान यांचा मेळ घालून एखादी गोष्ट साध्य करणे अगर त्यातून तोडगा काढणे याला आत्मज्ञानी म्हणतात.

याप्रमाणे विवेकी माणूस ज्ञानाचा उपयोग करुन आपल्या अंत:करणात असणारा आनंदाचा ठेवा शोधून काढतो व तो ठेवा इतरांना वाटतो. इतरांना सुखी समाधानी करतो व स्वत: पण आनंदी जीवन जगतो.

या उलट जो ज्ञानामुळे गर्विष्ष्ठ होतो ज्याला ज्ञानाची उर्मी ते तो अधिक अडचणीत येतो. या दोन्हीच्या पलीकडे जावून जो विवेकी त्या ज्ञानाचा शोध घेतो तोच खरा स्वानंदी बनतो.

माणसांनी ज्ञान जरुर मिळवावे पण त्याचा उपयोग इतरांना व स्वत:चा सुख समाधान आनंद देण्यासाठी सर्व प्राणीमात्रांचे रक्षणासाठी करावा.

पैसा मिळतो म्हणून प्रकृतीची हानी करणारे तंबाखू किंवा चरस यांचे उत्पादनाचे ज्ञान शेतकर्‍याला हानी पोहचवते.

तसे वैयक्तिक लाभासाठी अणुबॉम्बचे संशोधन ही सुद्धा अविद्येची उपासना ठरेल.

तेव्हा अविद्या व विद्या या दोन्ही बाबतीला फायदा व तोटा याचा विवेकाने विचार करुन या पलीकडे असणारे आत्माविद्येचे ज्ञान माणसाने घ्यावे.

जो हे आत्मविद्येचे ज्ञान घेतो तो आनंदाचा ठेवा पाहू शकतो.

Leave a comment