आयुष्य खूप छोटं आहे, भांडत नका बसु,
डोक्यात राग भरल्यावर फुटणार कसं हसु?
अहंकार बाळगू नका, भेटा बसा, बोला,
मेल्यावर रडण्यापेक्षा, जिवंतपणी बोला,
नातं आपलं कोणतं आहे महत्वाचे नाही,
प्रश्न आहे कधी तरी गोड बोलतो कां नाही?
चुकाच शोधत बसाल तर सुख मिळणार नाही,
चूक काय बरोबर काय कधीच कळणार नाही.
दारात पाय ठेवू नका, तोंड नाही पहाणार,
खरं सांगा असं वागून, कोण सुखी होणार ?
तू तिकडे आम्ही इकडे, म्हणणं सोपं असतं,
पोखरलेलं मन कधीचं सुखी नसतं .
सुखाचा आभास म्हणजे खरं सुख नाही,
आपलं माणूस आपलं नसणं, या सारखं दु:ख नाही,
नातं टिकलं पाहिजे, असं दोघांनाही वाटावं,
कधी गाईने कधी वासराने एकमेकाला चाटावं,
तुमची काहीच चूक नाही अस कसं असेल,
पारा शांत झाल्यावरच सत्य काय ते दिसेल.
ठीक आहे, चूक नाही, तरीही जुळतं घ्या,
बॉडी डेड होण्या आधीच अलिंगन द्या !
जिवंतपणी माणसावर प्रेम करायलां शिका…