मनुष्य जीवनात माणूस सतत सैरावैरा धावत असतो कारण त्याला सतत कोणत्या ता कोणत्या गोष्टीची भिती वाटत असते.
ही भिती त्याला शांततेने जगु देत नाही. त्याला सतत भासत असते की कोणीतरी आपल्या पाठीशी लागले आहे व ते आपणाला पकडून घेवून जाईल व सर्व आयुष्य बरबाद होईल.
ही झाली माणसाच्या मनाची अवस्था .
हा एक प्रकारचा भ्रम असतो.
आपण एका ठिकाणी अशा वेळी स्थिर उभा राहिलो, शांततेने चिंतन केले तर लक्षांत येते, अरे मागे कोणीच नाही. आपण उगाचच भितीने सेरा वैरा पळत आहोत.
हा भ्रम असतो. तो भ्रम दूर करणे गरजेचे असते.
जो विवेकी शांतपणे चिंतन करतो तो भ्रमनिरास होवून जातो. तो अभय होतो. त्याला आयुष्यात कसली भिती उरत नाही.
भ्रम, भिती ही राक्षसाप्रमाणे पाठलाग करीत असते. साधकाचे जीवन असहाय्य करुन सोडते. म्हणतात ना भित्या पाठी ब्रम्हराक्षस.
या राक्षसावर साधकाला विजय मिळवायचा आहे. या भ्रमातून भितीतून बाहेर पडावयाचे आहे. या संकटाला सामोरे जायचे आहे.
आयुष्याचे प्रत्येक टप्यात साधकाने अशा भितीदायक भ्रमातून बाहेर पडणे गरजेचे असते.
हाच भ्रम परमार्थात पण साधकाला परमेश्वराची भेट घेवू देत नाही. अनंत अडचणी समोर उभ्या करतो पण जो साधक शांतवृत्तीने या भ्रमाचा अभ्यास करतो, श्रद्धा ठेवतो तोच रस्ता आडवणर्या भ्रमाचा नाश करु शकतो व आनंदी जीवन जगू शकतो हा भ्रमराक्षस कितीही बलवान असो निर्भय साधक खात्रीने त्याचा मुकाबला करु शकतो.
हीच माणसाची जीवन जगण्यातील महत्वाची गरज आहे. तेव्हा साधू संत आपणास नेहमी सांगत असतात.
निर्भय हो मना । निर्भय हो मना । मी तुझ्या पाठीशी आहे.
घाबरु नकोस निष्काम, निर्मोही हो, खळांची व्यंकटी सांडो, सत्कर्मी रति वाढो, भूता परस्परे लाभो, मैत्र जीवाचे.
हे साध्य केले की, माणसाची आयुष्य जगण्याची भिती निघून जाते.
तेथे लक्षात येते भित्यापाठी ब्रम्हराक्षस कसा लागतो व त्याचे हरण कसे होते.
या ब्रम्हराक्षसाला आपल्या जीवनातून हरण करा.. जीवन आनंदी करा..