शाप म्हणजे काय ?
एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही, तर माणसाला राग येतो तो क्रोधीत होतो व त्या क्रोधातून त्याच्या तोंडून ज्या अघटित घटना वदल्या जातात त्याला शाप म्हणतात.
हा प्रकार मानवामध्येच दिसतो असे नाही, तर आतुरतेने पावसाची वाट पहात बसलेल्या चातक पक्षी वाट पाहून पाहून पाऊस येत नाही. हे पाहून पावसालाच शाप देत आहे.
त्या शापाचे सुंदर वर्णन माझ्या नजरे समोर आले ते असे –
चोचीने कोरले, नखांनी उकरले, तरी जमिनीत झरा लागत असे,
व्याकुळलेल्या जीवांची पूर्वी तहान भागत असे.
येरे येरे म्हणताच पाऊस येत असे.
त्यालाही ठाऊक असे पैसा आहे खोटा.
पैसा खोटा होता तरी माणूस मात्र खरा होता.
प्रत्येकाच्या काळजात जिव्हाळ्याचा झरा होता.
ये गं, ये गं म्हणताच सर यायची धावून.
चिमुकलीच्या मडक्याला ती ही न्यायची वाहून,
एकदा पाऊस आला की मुक्कामी रहात असे,
निघुन जा म्हटलं तरी मुद्दाम जात नसे.
हल्ली येरे, येरे म्हटलं तरी पाऊस साद देत नाही.
खर्या पैशाला ही मुळीच दाद देत नाही.
कत्तल केली जंगलांची पशु पक्षी राहिले नाही.
जमिनीला भोकसताना मागे पुढे पाहिले नाही.
हौद हरवले गुरांचे पाणपोई दिसत नाही.
बाजार मांडला आहे पाण्याचा ह्यावर विश्वास बसत नाही.
पाऊस, बॉटल, कॅन, ट्रॅक्टर आले, मडके केव्हाच फुटले ,
कशी येणार सर धावून, नाते आपुलकीचे तुटले,
कुठे राहिली ओढ्याला सांग बरं ओढ,
कितीही प्रगती केली विज्ञानाने,पाऊस होतो का डाऊन लोड ?
तुझ्या स्वार्थासाठी पाऊस येईल कशाला ?
तुझ्यामुळेच कोरड पडली नदी, विहिरीच्या घशाला.
तुच भोग तुझी फळे, फेड तुझेच तुच पातक,
बघ कसा शाप देतोय तहानलेला चातक..
याप्रमाणे चातक पक्षी मानवाने केलेल्या अत्याचाराचे वर्णन करीत आपली केवीलवाणी अवस्था कशी झाली हे सांगत आहे व निसर्ग कोपाचा मानवाला शाप देत आहे.
1 Comment
सौ.सुघा मोरे.
खुपच छान.
बरेचं बारकावे अचुक व अलगद रेखाटले आहेत.
वस्तुस्थितीवर भर आहे.
कविता मनाला रुचेल पचेल व मनाला भुरळ घालणारी आहे.
आपले कवि मन असेच जपावे.
मला आपली “शाप तहानलेल्या चातकाचा” हे मनापासुन केलेले काव्य खुप खुप भावले व मनाची मरगळ माझी दूर झटकुन दिली, मन पुन्हा ताजेतवाने झाले.
आपल्या हातुन असेच लिखाण होवो.व आम्हास ते वाचावयास मिळो.आपल्या पुढील कार्यास खुप साऱ्या शुभेच्छा.
सौ.सुघा मोरे.