परतफेड, कर्जमुक्ती

कर्ज काढून सण साजरा करणे हे माणसाचे जीवनात सतत चालूच असते. किंवा माणसाचा जन्मच मुळी कर्जातून होतो.

गेल्या जन्मात घेतलेले कर्ज न फेडल्यामुळे ते फेडण्यासाठी पुनर्जन्माच पाळी त्याच्यावर येते.

अशा या कर्जाची जाणीव प्रापंचिकाने जन्मभर ठेवणे गरजेचे आहे. ती जाणीव ठेवली नाहीतर रडण्याची पाळी त्याचेवर येईल.

परतफेडीची हमी देऊन घेतलेल्या कर्जाची फेड करणे हे आपले कर्तव्य असते. लेखीटाकी केलेले व्यवहार एक वेळ नष्ट होतील तेथे आपल्याला वाटेल आपण कर्जमुक्त झालो पण जो सृष्टीचा करता करविता आहे. त्याचे ठिकाणी या नोेंदी पक्क्या असतात. वेळाने कां होईना त्या कर्जाची आठवण त्या व्यक्तीला भगवंत करुन देतो तशी त्याला नोटीस पाठवितो.

प्रापंचिक तात्पुरता नफा तोटा पहात असतो त्यामुळे या परतफेडीकडे तो गांभीर्याने पहात नाही. उलट परतफेड नाही केली तर कोण काय करणार आहे? ही भावना त्याचे ठिकाणी उत्पन्न होते.

सर्वत्र अराजकाची भावना पसरते. जर कर्जदाराने विवेक जागृत ठेवून ऋणाची परत फेड याच जन्मात केली तर त्याचा पुनर्जन्म टळू शकेल.

परतफेड हा सृष्टीचा न्याय आहे. सृष्टीतच्या मातीत आपण एक बिजाचे रोपण केले तर हजारो दाण्यांनी भरलेले कणीस आपणास मिळते, ही अनोखी परतफेड नाही का?

परमार्थात पण साधकाने, ईश्‍वराचे रुपाने आपणास दिलेले जीवन हे कर्ज आहे असे समजून प्रत्येक दिवशी त्या कर्जाची फेड करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.

प्रत्येकाने आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण परतफेडीच्या भावनेतून अनुभवला पाहिजे.

1 Comment

  • drsameerbhandari@gmail.com
    Posted May 21, 2022 11:23 am 0Likes

    मला हे डॉक्टरांचे चिंतन वाचताना फलटणचे शिवाजीराव भोसले यांची आठवण झाली ते प्राचार्य होते त्यांची व्याख्याने आपण साताऱ्यात ऐकली आहेत
    त्यांचे सुधा चिंतन नावाचे एक पुस्तक निघाले आणि व्यवहारात दिसणाऱ्या इतक्या छोट्या छोट्या गोष्टीवर त्यांनी चिंतन केले आहे

Leave a comment