सारांश याचा अर्थ ‘अ’ सार काढून काढून जे सार (चांगले) शिल्लक रहाते, त्याला सारांश म्हणतात.
प्रपंचात मनुष्य जन्म घेवून या सृष्टीत उतरतो. जन्मापासून त्याचा या सृष्टीत फापटपसारा करण्याचे सुरु होते.
तो पसारा एवढा वाढतो त्याला सीमा रहात नाही.
शेवटी त्याचे लक्षात येते, यात नाही अर्थ नाही.
मला जे करावयाचे होते त्याचा मी विचारच केला नाही.
या मोहजाळात अडकून मी कुठल्या कुठे वहात गेलो?
माझी अवस्था काया झाली? त्यावेळी मला माझा विनाश दिसू लागतो.
तेथे मला एक एक गोष्टींची आठवण होवू लागते.
1. माझी बुद्धी भ्रष्ट झाली
2. मी हीत कोणाचे केले नाही.
3. मी दानधर्म केला नाही.
4. देवाची पूजा केली नाही.
5. धर्माचे पालन केले नाही.
6. योग्य वेळी योग्य कर्मे केली नाहीत.
माझ्या पदरी जे आयुष्य लाभले आहे, हे फुटक्या भांड्याप्रमाणे आहे. त्या भांड्यात किती जरी पुण्याचा साठा टाकण्याचा प्रयत्न केला तरी तो साठा खालून रीता होत आहे.
आयुष्याचे तीसर्या टप्यात सारंश रुपाने मला जीवनाचे सार लक्षात येत आहे.
तेथे परमेश्वर मंदीराची जाण मला होवू लागते. या ठिकाणी प्रापंचिकाची प्रपंचातून परमार्थाकडे नजर वळते.
येथे ही संपत्ती, समृद्दी मला कायम आनंद देईल असे मला वाटत नाही. तेथे चिंतन सुरु होते.
त्या चिंतनातून पावलापावलाने परमार्थाकडे वाटचाल सुरु होते. या वाटचालीत साधुसंत यांची भेट होते व आयुष्यच बदलून जाते.
हळूहळू षङरिपुवर स्वामित्व येते. विवेक जागृत होतो.
हीच जीवनाची सद्गती होय.
हे सर्व आयुष्याचे शेवटी जाणवते, तेथे पण नामस्मरणाचे सार लक्षात आले तर त्याला सद्गती प्राप्त होवू शकते.
येथे सरांश रुपाने आयुष्याचा विचार करावयाचा झाला तर, जो नामात राहिला तो तरला, असे म्हणावे लागेल.
जीवनांत कर्माने फापटपसारा वाढवू नका. अहित गोष्टींचा त्याग करा. लोभा मागे पळू नका, विवेक बुद्दी जागृत करा.
नामाची संगत सोडू नका , हेच आयुष्याचे सार सारांश रुपी आहे.