संक्रांत म्हणजे संक्रमण, एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी प्रवेश करणे.
या प्रवेशानिमित्त सर्वांना संक्रांतीच्या शुभेच्छा – हे संक्रमण
1. प्रगतीच्या दिशेने संक्रमण
2. निसर्गात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. हा सूर्याचा आनंदोत्सव असतो.
एका राशीतून सूर्याची दूसर्या राशीत संक्रमण होत असते. संक्रमण म्हणजे पुढे पुढे जाणे. सूर्य उत्तर ध्रुवावर 6 महिने तर दक्षिण धृवावर 6 महिने असतो.
संक्रांतीच्या दिवशी सूर्य अंधारातून प्रकाशाकडे संक्रमीत होतो. हे त्याचे संक्रमण म्हणजे सम्यक क्रांतीच होय. वैचारिक क्रांती, अक्रमक विचार बदलायचे ते सौम्य करावयाचे, विकारावर ताबा आणायचा.
3. संग क्रांती – नि:संग होणे. काम क्रोध, मोह, माया या पासून मुक्त होणे. सर्वांमध्ये असून अलगत निवृत्त होणे.
4. सर्वांना एकत्र करुन काम करणे. समर्थ रामदासांनी सम्यक क्रांतीचे महत्व सांगितले आहे. एकजुटीचे सामर्थ्य फार मोठे आहे. आजच्या या संक्रांतीपासून एकीने रहाण्याचा नियम सर्वजण घेऊ.
संक्रांतीला काळ्या रंगाचे महत्व आहे. संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो व मकर राशीवर शनीचे अधिपत्य सांगितले आहे. शनिचा आवडता रंग काळा आहे. म्हणून शनीची कृपा व्हावी म्हणून या सणाला काळ्या रंगाचे महत्व सांगितले आहे.
या सणात स्त्रिया काळ्या रंगाच्या साड्या नेसतात. निसर्गात पण काळा रंग उबदारपणा देणारा समजला जातो. संक्रांतीच्या काळात थंडीचा कडाका थोपविणारा हा काळा रंग महत्वाचा मानला जातो. संक्रांतीचे महत्व या गोष्टीत दिसून येते.
1. उषा – नूतन वर्षारंभणाचे स्तवन.
2. प्रेमभावाचे प्रगटीकरण.
3. गुळा सारखे गोड व्हायचे.
4. षड्रिपूवर ताबा मिळविणे.
5. विरक्त होणे.
6. सांघीक भाव निर्माण करणे.
7. आक्रमक विचार सौम्य करणे.
याप्रमाणे सूर्याचा प्रकाश, फुलांचा स्नेह, गुळाचा गोडवा, तिळाचा मोह, पतंगाचा सूत्रधार, धरावे स्नेहाच्या विश्वासाला कणाकणातून विसरुन जावून माझे मी पण.
या निमित्ताने माझा अहंकार नष्ट होतो. सोन्याच्या व तिळाच्या दागिन्यात मला फरक वाटू नये ही त्या मागील भावना.
त्या भावनेचा स्विकार होवो.