जीवनात दिव्या प्रमाणे कसे काम करावे हे सांगितले आहे.
दिव्या दिव्या दिपत्कार, नाश करीशी अंध:कार,
दीपका दिपक लावियल्या ज्योती, घरभर वाती शुन्य झाल्या ॥
जीवनाचे रहस्य काय ? उद्दीष्ट काय? कार्य काय याचे मार्गदर्शन या ओळीतून होते.
एखादा कार्यक्रम असतो व त्या कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलनाने केली जाते. त्याचा अर्थच असा असतो की, या दीपप्रज्वलना प्रमाणे समाजातील अनिष्ठ रुढीवर, चालीवर प्रकाश पडो, आपल्या डोळ्यासमोर असलेल्या अज्ञानाचा अंधार दूर होतो व चांगले विचार, चांगली माणसे आपल्या नजरेस येवो..
दुरितांचे तिमिर जावो, दुष्ट विचारांचा अंध:कार नजरे समोरुन जावो.
संत ज्ञानेश्वरांनी पसायदानांत हीच मागणी केली आहे. ते म्हणतात या पृथ्वीतलावर असलेले असंख्य साधक हे वाती प्रमाणे आहेत. त्यांचे मनामध्ये चांगला भाव आहे.
तो भाव संतांचे सानिध्याने चैतन्यमय होवून प्रत्येकाचे मनांत प्रज्वलीत झाला तर जगाचे कल्याणच होईल.
सर्वत्र सुख समाधान पसरेल.
अशी ज्योत प्रकाशीत करणारी माणसे, संत यांची आज गरज आहे. उंच डोंगरामाथ्यावर प्रवाहीत झालेली नदी (सरीता) वहात वहात सुष्टीतील मख,पानं, फुलं, मांगल्य वाहून तेथे स्वच्छ वातावरण निर्माण करते.
त्याप्रमाणे समाजात संत मंडळींनी पदयात्रा करीत गावोगावी जातात, तेथे प्रबोधन करीत ज्ञान ज्योतींने जगाचा उध्दार करतात.
प्रेमाच्या वातीने व दिपाच्या सहाय्याने आनंदी जीवनाची ज्योत तेवत ठेवावी, हीच इच्छा.
1 Comment
सो. शिला केतकर
ज्योतीने ज्योत पेटवावी आणि सर्व जग प्रकाशमय करून टाकावे तसेच संत महंत त्यांनी गावोगावी जाऊन ज्ञानाची ज्योत पेटवुन अज्ञान नाहीसे करणे आणि ते सुद्धा प्रेमाने करणे ते पुर्वीही केलेले आहे आणि आजही ते करत आहेत आपण माऊलींचे उदाहरण देऊन फारच छान स्पष्ट केले आहे🙏
राम कृष्ण हरी