नामसंकीर्तन साधन पै सोपे, सुखे घरा येतो नारायण

कोणत्याही ठिकाणी जायला अगर तेथून येण्यासाठी कोणते न कोणते साधन गरजेचे आहे. ते साधन अनेक खटाटोप करुन प्राप्त करावे लागते.

तसे परमेश्‍वर चरणी पोहोचण्याचे किंवा परमेश्‍वराला आपल्या घरांत बोलविण्याचे सोपे साधन म्हणजे परमेश्‍वराचे नामस्मरण व किर्तन होय.

हे सर्वात सोपे साधन होय.

नामस्मरण हा ऐक होमच आहे. या होमाग्नी मध्ये आपण अनंत जन्माची अनंत पापे अर्पण करतो. तेथे ती पापे नष्ट होतात,

त्यासाठी वनांत जावून तपश्‍चर्या करण्याची गरज नाही. तुम्ही आहे त्या ठिकाणी असाल त्या परस्थितीत परमेश्‍वराचे नाम घेऊ शकता.

तेथे तुमची गरिबी श्रीमंत आड येत नाही. उठता बसता, चालता झोपता तुम्ही परमेश्‍वराचे नाम घेऊ शकता. नामाचा जप चालू ठेवला तर प्रत्यक्ष नारायण तुम्हाला शोधायला तुमच्या घरात येईल. असे अद्वितीय सामर्थ्य नामामध्ये आहे.

असा तो परमेश्‍वर आपण सृष्टीमध्ये इतरत्र शोधत असतो. तो आपल्या प्रपंचाच्या दगदगीत नजरेस येत नाही.

त्यासाठी चिंतनाची गरज आहे. ते चिंतन नामस्मरणा शिवाय होवू शकत नाही.

यासाठी तुम्ही प्रात:काळी उठून अंतर्मनात शिरुन भगवंताचे ध्यान धारण करा, त्यामुळे तुमच्या ह्रदयांत असलेल्या भगवंताची ज्योत प्रकाशीत होईल. तुम्हाला भगवंताचे प्रेम वाटू लागेल.

अखंड सहवासामुळे भगवंत तुमचे ह्रदयात, हृदयाच्या गुहेत विनासायास येऊन बसतील. कोणताही इतर यज्ञ याग करण्याची गरज पडणार नाही.

येथे तुकोबा म्हणतात हे सोपे साधन मी तुम्हाला देत आहे.
परमेश्‍वराला त्याची आठवण आवडते. जो आवडीने त्यांची आठवण काढतो तो त्याचेकडे न बोलविता जातो.

आठवणीच्या बासरीच्या सुरांनी (हाकेने) इतरत्र गेलेली गाय, वासरे घरी परततात, तर मग परमेश्‍वर तुमच्याकडे कां बरे येणार नाहीत?

यासाठी गुणग्राही बना परमेश्‍वराचे गुण गौरव किर्तनात करा.

तुम्ही एकपट दिले तो तुम्हाला दसपट देणार हा त्याचा न्याय आहे.

त्यामुळे नामस्मरण सोडू नका.

नामस्मरणाने परमेश्‍वर तुम्हाला शोधत तुमचे घरी येईल.

1 Comment

  • सो. शिला केतकर
    Posted June 24, 2022 6:17 pm 0Likes

    खरंच आहे नाम संकीर्तन ना मुळे परमेश्वर आपल्याला शोधत येतो

    नाहम् वसामि वैककुंठे
    नाहम् वसामि गोकुले
    मद् भक्ता यत्र गायन्ति
    तत्र तिष्ठामि नारद

    माझे भक्त ज्या ठिकाणी भक्तिपूर्वक माझे नामस्मरण करतात त्या ठिकाणी मी जातो🙏

Leave a comment