ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ति असु द्यावे समाधान.
आनंदी मनांत सुख सामावले आहे. दु:खी मन नरकाकडे बोट दाखविते. आनंदी मन स्वास्थाचे गूढ आहे.
जेव्हा आपण दुसर्याला आनंदी करतो त्यावेळी तो आनंद अनेक रुपाने तुमच्याकडे येतो.
सुंदर सुंदर फर्निचर, गालीचे, सोफा घराला सुंदर बनवितात. पण आपली ही आनंदी वृत्ती घराला घरपण देते.
राग ही अशी एक वस्तु आहे जीचा आपण त्याग करावा व ती पैसेवाल्याकडे सोपवावी. आपण रागाचे नादी लागु नये होणार असते त्यासाठी रडून काय मिळणार.
झालेल्या गोष्टीचा विचार आपण करु नये. याचाच अर्थ जीवनांत प्रत्येक प्रसंगांत आनंदी रहा.
तासाभराचे आनंदासाठी विनोद, मस्करी करा.
दिवस आनंदात जाण्यासाठी सहनशीलता वाढवा.
एका आठवड्याच्या आनंदासाठी थंड हवेच्या ठिकाणी जावून या.
वर्षाचे आनंदासाठी श्रीमंत लोकांचे संगतीत जा.
पण जीवनभराचे आनंदासाठी जीवनांत येणार्या प्रत्येक प्रसंगांत आनंदी रहाण्याचा प्रयत्न करा.
आनंदी जीवनाचा संमंध पैसे व पद यांच्याशी नाही तर तो आपल्या मनस्थितीशी आहे.
नेहमी सकारात्मक वृत्ती ठेवा. गरीब माणूस घोगड्यावर पण शांत झोपू शकतो पण श्रीमंत माणसाला मखमली रजईवर पण शांत झोप येत नाही.
आनंदी कोणत्याही बाहा गोष्टीवर अवलंबून नाही तर ज्या गोष्टी आपल्या जवळ आहेत त्यामध्येच तो दडून बसला आहे.
विष देवून एकाद्याला कोणीही मारु शकते. पण गोड बोलून त्याला आनंदी माणूसच जिंकु शकतो.
आनंदी आणि हसतमुख रहाणे ही एक प्रार्थनाच आहे. कोणत्याही विचित्र प्रसंगांत (परिस्थितीत) आनंदी रहाणारा खरा धार्मिक म्हणावा लागेल.
आनंदाच्या संगतीत आनंद द्विगुणीत होतो तर दु:खाचे प्रसंगी आनंदाची साथ मिळाली तर दु:ख नष्ट होतो.
तेव्हा जीवनात प्रत्येक प्रसंगात आपण आनंदी रहाण्याचा प्रयत्न करुया.
आनंदाचे डोही आनंद तरंग….