एखाद्या ठिकाणची सजावट करताना आपण निरनिराळ्या प्रकारे ती करतो.
कांहीजण फुलांनी सजावट करतात. कांहीजण पानांनी तर कांहीजण दिव्यांनी सजावट करतात.
दिवाळीत मात्र मंदीराची सजावट दिव्याने केली जाते. त्या सजावटीला दिपोत्सव म्हणतात.
हा दिपोत्सव माणसाला आनंद देणारा. परमेश्वराचे स्वरुप दाखविणारा समजला जातो. त्यामुळे प्रपंचात व परमार्थात दिव्याची सजावट कशी असावी याचे वर्णन यात केले आहे. ते असे
ऊन सावल्या येतील जातील कोण जपावे आतील हिरवे,
चला दिवाळी आली आहे, ओंजळीत घ्या चार दिवे.
ते कसे लावा –
पहिला लावा थेट मनातच, तरच राहिल दुसरा तेवतं.
घरात आणि प्रियजनांच्या आयुष्यावर प्रकाश बरसत.
तिसरा असु दे इथे अंगणी, उजेड आल्या गेल्यांना.
हा चौथा ठेवा अशा ठिकाणी, जिथे दिवाळी माहित नाही.
अशा प्रकारे दिवाळी कशी साजरी करावी? गरीबा पासून श्रीमंतापर्यंत सर्वत्र आनंदी आनंद होईल. त्या दिव्याचा प्रकाश पडेल अशी दिवाळीच्या दिव्याची सजावट करा असे येथे सांगितले आहे.
जेथे गरज आहे जेथे अज्ञानाचा अंधकार आहे तिथे दिवा लावा असा त्याचा अर्थ आहे.