जीवनात जी गोष्ट होवू नये असे वाटते त्यासाठी कांही उपाय सांगितले जातात त्या बंधनांना पथ्य म्हणतात.
प्रपंचातही पथ्य सांगितली जातात.
वैद्यकिय क्षेत्रात रोगी उपचारासाठी चांगल्या वैद्याकडे जातो वैद्य त्याचे चिंतनातून त्याला योग्य औषधी उपचार करतो. असे बरेच दिवस चालले असतात. रुग्ण बरा होण्याऐवजी जास्तच रोगाने घेरला जातो.
तेव्हा डॉक्टर चिंतन करतात, त्याच्या घरच्या लोकांशी चर्चा करतात तेथे त्यांचे लक्षात येते की हा रुग्ण मधुमियाचा असून साखर वगैरे खायाची पथ्य पाळत नाही.
तेथे चिंतनातून डॉक्टर पथ्य सांगतात. ते म्हणतात तुला आरोग्य संपन्न व्हावयाचे असेल तर पथ्य पाळले पाहिजे. या ठिकाणी चिंतनातून जसे औषध निघाले तसे त्या रोग्याला पथ्य काय पाळावे हे समजले म्हणजे औषध व पथ्य ही दोन्ही महत्त्वाची आहेत.
हजारो रुपये खर्चून भारी उपाय केला व पथ्य सांभाळले नाही तर सर्व व्यर्थ होईल.
तेव्हा चिंतन काय सांगते ?
‘‘पथ्य’’ काय करु नका, काय खावू नका असे जीवन जगा – या सर्व गोष्टी घाई गडबडीत साध्य होत नाहीत.
त्यासाठी शांतता एकांत गरजेचा असतो.
तेव्हा अशी चिंतने प्रात:काळी परमेश्वराला स्मरुन करावीत तो ईश्वर चिंतनातून तुम्हाला पथ्य सांगेल व तुमचा दूर्धर रोग बरा होईल.
परमार्थात पण आपण रोज थोडावेळ चिंतन-मनन-नामस्मरण करावे.
त्यातून परमार्थातील पथ्ये आपणासमोर येतील व आपला परमार्थाकडे जाण्याचा मार्ग सुकर होईल.
असे हे चिंतनातून निघालेले पथ्य आपण पाळावे. शारीरिक मानसिक स्वास्थ सुधारावे हीच अपेक्षा.