जी म्हणजे जीत- त्याच्या लळा लागला की सुरु होतो जिव्हाळा.
असा हा जिव्हाळा आपणास अनेक ठिकाणी दिसून येतो. नाते संबंधात एकमेकामध्ये चांगले संबंध आले प्रेम वाढले की आपण म्हणतो त्यांचा जिव्हाळा आहे.
असेच, राजकारणात ज्यांचे प्रेम जमते तेथे लोक म्हणतात. या दोन नेत्यांमध्ये जिव्हाळा आहे.
जिव्हाळा म्हणजे प्रेम – मैत्री.
जिव्हाळा हे एक लोहचुंबक आहे ते समविचारी माणसांना एकत्र करते व त्यांची मोट बांधते ही बांधलेली मोट त्या व्यक्तीला यशाचे शिखरावर नेवून ठेवते.
जीवनात यशस्वी होण्यासाठी ही यशाची मोट जरुरी असते. प्रेमा द्वारे बांधलेली ही मोट सुटू नये या भितीने मनुष्य ती जपण्याचा प्रयत्न करतो.
याचाच अर्थ जोपर्यंत जिव्हाळा आहे तोपर्यंत प्रपंच आहे. तो जिव्हाळा कमी झाला की सर्व संपले. यासाठी प्रापंचिकाने तो टिकविण्याचा प्रयत्न करावा.
परमार्थात पण या जिव्हाळ्याचे महत्व आहे.
परमेश्वर पण प्रेमाचा भुकेला असतो. त्याला पैसा, आडका, सोने कांही नको असते.
त्याला फक्त प्रेम-जिव्हाळा हवा असतो.
प्रत्येक माणसाने तो जिव्हाळा परमेश्वराला आला हीच अपेक्षा.