पतित पावन होशी म्हणूनी आलो मी द्वारा । पतित पावन न होशी म्हणूनि जातो माघारी ।

पापी-पतीत जनांचा उद्धार करण्यासाठी परमेश्वर दारात आला, तरी हे पाहून परमेश्वर म्हणतो मी परत जात आहे. मी तुझ्या हट्टाला कंटाळून परत जात आहे.

यामध्ये सामान्य जन व परमेश्वर यांनी संवाद कथन केला आहे.

परमेश्वर सर्वाचा कर्ता आहे तो पाप नष्ट करणारा आहे. हे कळून देखील एखादा माणूस त्या भगवंताची भक्ती प्रेमाने करीत नसेल तर कंटाळून परमेश्वर म्हणतो – जातो माघारी .
अशा हट्टी श्रावकापुढे परमेश्वर पण हात टेकतो व परत स्वगृही परततो.
ज्याप्रमाणे एकादा बालक संस्कारक्षम व्हावा म्हणून त्याचे माता-पिता त्याला गुरु कडे पाठवितात. गुरु त्याचेवर संस्काराचे धडे घडवितात. पण बालकाचे मनावर त्याचा काहीच परीणाम घडत नाही हे पाहून गुरु त्या बालकाला त्याचे माता-पिताचे स्वाधीन करतात, हात टेकवितात.

तसे गुरुस्थानी असलेले भगवंत आपण हट्टी जन आपला हट्ट सोडत नसल्याने परत स्वगृही जातात. ही खंत भगवंताना लागते.
जीवनात आपण साधु संत भगवंत यांचा शोध घेत राहिले पाहिजे. त्यांचे सानिध्य लाभेल तेथे ते घेतले पाहिजे. नाहीतर आलेली संधी निघून जाईल व भगवंताची भेट होणार नाही.

तो नाराज होवून परत जाईल. प्रत्येक साधकाने चिंतन मनन करुन भगवंताची भक्ती केली पाहिजे. भगवंताचे नामस्मरण त्याची ओळख करुन देईल व एकदा ओळख झाली की आलेली संधी आपण कधी गमवणार नाही. परमेश्वराला हताश होवून म्हणावे लागणार नाही. जातो माघारी.

साधकाने भक्तीने प्रेमाने भगवंताला म्हणले पाहिजे – पतित पावन करशील म्हणून आलो मी द्वारा.

1 Comment

  • Anonymous
    Posted August 13, 2022 9:45 pm 0Likes

    छान

Leave a comment