देवाचिये दारी उभे क्षणभरी

सर्व संतांनी भक्ती भावाने एक क्षणभर जरी देवाच्या दारात उभे राहिलो, देवाला आळविले, हाक मारली तर त्या आर्त हाकेला देव साद घालतील.

सर्व दिशेतून ते आपल्या मदतीस धावून येतील. मात्र हा भक्ती भाव त्यामध्ये असला पाहिजे.

नुसत्याच मागण्या करण्यासाठी व परमेश्‍वरालाच आपले काम करण्यास लावण्यासाठी त्याच्या दारात उभे राहू नये. त्याला त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मी हे करीत, ते करीन, हे देईन, ते देईन असे अमिष पण दाखवू नये.

तो सर्वांचा दाता आहे त्याने आपणाला आपल्या लायकी पेक्षा अनेक पटीने दिले आहे. तेव्हा त्याचे दारात परत परत भीक मागणेसाठी उभे राहू नये.

तर त्याचे दारात उभे राहिल्यावर त्याचे जपाचे स्मरण करावे व भक्तीने त्या परमेश्‍वराचे आभार मानावेत. त्याचा गोडवा गावा.

तो तुमच्या प्रेमाचा भुकेला आहे, त्याची भूक तुम्ही प्रेमाने भक्तीने भागवावी.

त्याच्या नामात रहा हीच त्याची खरी व श्रेष्ठ भक्ती आहे.

साधकाने कृतज्ञतेचा भाव ठेवून देवाचे दारी क्षणभर उभे रहावे. तो दयाळु परमेश्‍वर काही न मागता तुमचे मनोगत ओळखून ते पूर्ण करण्याचा प्रयास करील.

1 Comment

  • सौ. शीला केतकर
    Posted September 27, 2022 11:57 am 0Likes

    खरे आहे देवाच्या दारामध्ये क्षणभर उभे राहून देवाला आर्ततेने, भावपूर्ण, भक्तीने हाक मारली की तो निश्चितच धावून येतो. कुठल्या रूपाने येईल हे सांगता येत नाही

    परंतु त्याच्यासमोर मागण्यांची लिस्ट घेऊन उभे राहणे योग्य नाही🙏 राम कृष्ण हरी🙏

Leave a comment