योगी रामकृष्ण परमहंस

योगी रामकृष्ण परमहंस यांनी केलेली प्रार्थना —

दीन दयाळा हे परमेशा ।
करुणा सागर हे जगदीशा ।
कैवारी तु सकल जीवांचा ।
उद्धारील तू कित्तेक जीवांना ।
अजब तुझी करणी ।
देवा शरण तुझ्या चरणी ।
देई अभय प्रभु, देई शक्ति ।
देई सुमती, सार्थक करण्या ।
या जन्माचे यावे देवा ।
अत:र्यामी देवा, शरण तुझ्या चरणी ।
भवभ्रमणाने थकलो आता ।
भव फेरा हा दूर करावा ।
अमर सुखाचा मेवा द्यावा ।
केवळ ज्ञानी तू गुण खाणी ।
देवा शरण तुझ्या चरणी

या प्रार्थनेतून योगी रामकृष्ण परमहंस यांची दिलेला संदेश व आर्त प्रार्थना आपण जाणून घेणार आहोत.

हा संदेश म्हणजे जीवनात चैतन्य निर्माण करणारे अमृत पान आहे.

रामकृष्ण परमहंस म्हणतात, मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे. त्याचा अखंड आनंद (सच्चीदानंद) जो माणूस घेऊ शकत नाही. त्याचा जन्म वृथा (बिनकामाचा) आहे.

सरळ मार्गाने चाला, सर्वांवर विश्‍वास ठेवा. छलकपट करु नका, संसार करा, यात काही वावगे नाही. ते तर आपले कर्तव्य आहे. पण संसार करीत असताना चित्त परमेश्‍वराकडे ठेवा.

एका हाताने आपली विहीत कामे करा व दुसर्‍या हाताने भगवंताचे चरण घट्ट धरुन ठेवा .

आपली योग्यता ओळखून भरारी मारा. माया जालात गुंतून स्वत:चा घात करुन घेवू नका.

सर्वांत असुन कशात नसल्यासारखे रहा. तिर्‍हाईता प्रमाणे संसारात रहा. संसाराकडे पहा.

संसारात काम, क्रोध, मोह, माया अशा भयंकर मगरी रहातात. पण तुम्ही वैराग्य व विवेकाची हळद लावून या भवसागरात उतरला तर तुम्हाला त्यांचे पासून सुटका मिळेल.

भगवंत भक्ती करा, साधूसंत, विवेकी, सद्गुरु यांची कृपा असणे गरजेचे आहे. प्रेम करा, स्वत:च्या प्रिय देहाचाही यामुळे विसर पडेल.

ईश्‍वर आणि भगवंत यांचा संबंध जणू लोखंड व लोहचुंबक सारखा असतो.
साधू संत हे ईश्‍वरी आकार आहेत. त्यांचे जवळ चुंबकीय शक्ती आहे. त्यांचा संपर्क होताच मनुष्य जन्माचे सोने होण्यास वेळ लागत नाही.

आपण मनुष्य जन्म घेवून ईश्‍वराच्या सानिध्यात जाण्याचे टाळतो त्यामुळे आपला जन्म माती मोल होतो.

योगी रामकृष्ण परमहंस यांनी स्वत:साठी परमेश्‍वराकडे काही मागणी केली नाही. अनेक वेळा ईश्‍वराने समोर येऊन त्यांना सांगितले तुला काय हवे ते माग पण त्यांचे तोंडून काहीही मागणी गेली नाही.

मात्र वरील प्रार्थना त्यांनी ईश्‍वरा समोर केली.

धन्य ते योगी रामकृष्ण परमहंस.

Leave a comment