स्वयंवर – स्वत:च्या पसंतीने वर निवडणे, ही प्रथा रामायणापासून आज पर्यंत आपण पहात आलो आहे.
स्वत:च्यासाठी नवरा निवडताना स्वत: विचार करा, विवेकी व्हा.
उपवर झाल्यावर तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागणार आहे. तेव्हा मोहपाशात अडकून अविचाराने आपली पसंती दाखवू नका.
येथे कांही नियम पाळावयाचे असतात.
पुरुषाचे सौंदर्य पहावयाचे नसते. त्याचे कर्तुत्व लक्षात घ्यायचे असते.
स्त्रीच्या सौंदर्याबरोबर तिचा प्रेमळ स्वभाव हा गुण लक्षात घ्यावयाचा असतो.
ज्या घराण्याशी आपण संबंध ठेवणार आहोत ते सुसंस्कृत आहे का? त्यात कोणी व्यसनी नाही ना? याचा विचार करावयाचा असतो असे हे स्वयंवर सीतामाता पासून सध्याच्या गीतेपर्यंत झाले. त्यातुन खुप मार्गदर्शक तत्वे समोर आली.
अशी स्वयंवरे जेष्ठांचे उपस्थितीमध्ये कुटूंबात होत असतात.
या निमित्ताने एक बोध कथा समोर येते, ती अशी.
एका गावांत पारावर तीन मुले बसलेली असतात. अगदी गरीब घरातील, क्रोधीत कुटूंबातील, सामान्य कुटुंबातील. त्या तिघांनापण खूप भुक लागलेली असते. आपल्याला कोणी काहीतरी खाण्यास देईल काय? असा त्यांचे मनांत प्रश्न उभा रहातो.
त्याच वेळी समोरच्या घरातून एक गृहणी बाहेर डोकावते तिला या तीन मुलांची अवस्था पाहून त्यांचेबद्दल दया उत्पन्न होते व ती म्हणते बाळांनो तुम्हाला भूक लागली का? मी तुम्हाला कांही खायला देवू का? हे ऐकून त्या गृहीणीने त्यांना घरात बोलाविले.
दारात जाताच त्यांना घरात बोलाविले. दारात जाताच त्या मुलांनी सांगितले की आम्ही तिघे एकदम तुमच्या घरात येऊ शकत नाही. व आम्हा तिघांना पण जेवण करावयाचे आहे, तेव्हा ते उत्तर कसे द्यायचे हे तुम्ही ठरवा.
गृहिणी विचारात पडली. तीने आपल्या नवर्याला सर्व सांगितले तेव्हा नवर्याने तिला त्या तिघांची नांवे विचारली त्यातील
1. धन 2. सफलता 3. प्रेम अशी तिघांची नावे होती.
बायको थोडी उताविळ होती. ती म्हणाली आपण धनाला (पैशाला) बोलवू. तो आला की सर्व गोष्टी साध्य होतील.
माझ्या सर्व अपेक्षा पूर्ण होतील. दागदागिने , घर सर्व काही पूर्ण होईल. समाजात मान सन्मान मिळेल.
तेव्हा आपण पैशाला बोलवू हे एकून नवरा म्हणाला, माझ्या मते पैसा आला की, अहंकार चिकटतो . मोह, माया यांचे जंजाळ त्याचे बरोबर येते, तेव्हा आपण धनाच्या नादी न लागता सफलतेच्या नादी लागू. सफलता आली की पैसा आपोआप येईल. तेव्हा त्याची बायको म्हणाली, सफलते बरोबर त्याचा अहंकार घरात घुसेल व सर्व प्रपंचाचे वाटोळे करुन टाकेल.
हे त्यांचे बोलणे चालू असताना त्यांची लहानशी कन्या तेथे येते व म्हणते मला वाटते आपण प्रेमाला बोलवू. त्या उभयतांना आश्चर्य वाटले. एवढीशी कन्या प्रेमाला बोलवू म्हणते त्या प्रेमात काय आहे?
तेव्हा ती कन्या म्हणते जेथे प्रेम असते तेथे सत्कर्म घडतात. त्या सत्कर्मातून अपेक्षीत धनप्राप्ती होते व सफलता पण प्राप्त होते. मग सर्वत्र प्रेमच प्रेम दिसू लागते.
तेव्हा जेवणासाठी कुणाला प्रथम वरायचे हे या छोट्याशा मुलीने सांगितले.
श्रीमंत, अहंकारी, गर्विष्ट यांना वरु नका. सीतेने पण एवढे श्रीमंत धनीक, रथी महारथी आले असताना त्यांचे संपत्तीकडे न पहाता एक धनुर्धारी रामाची निवड केली . त्याचे कर्तुत्व पाहिले .
आपण प्रपंच करीत असताना कर्तुत्वाला प्राधान्य द्या. पैसा, संपत्ती ही नश्वर आहे. शाश्वत सुखासाठी निर्मोही रामाची निवड करा.
प्रत्येकाच्या घरात होणार्या अशा स्वयंवराला डोळस शुभेच्छा !
स्वयंवर झाले सीतेचे.. आज पहातो गीतेचे !