स्वानंदाच्या राज्यात पदार्पण करणारा बहुरुपी

बहुरुपी हे एक पात्र आहे.

अनेकांची हुबेहुब नक्कल दाखवत लोकांना चकीत करुन सोडणारे व आपला अर्थभाग साधणारे पात्र आहे.

प्रपंचात अशी हुबेहुब नक्कल करणारी अनेक पात्रे दिसतात. काहींना स्वार्थासाठी त्या त्या पात्राच्या भूमिका कराव्या लागतात.

भारत हा विशाल काय देश आहे. निरनिराळ्या अनेक राज्यामध्ये त्याची विभागणी झाली आहे जसे जम्मु-काश्मीर, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजराथ, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, केरळ, कोकण, हरीयाना.

माणसाला आनंद हवा असतो. त्याला आपण रहातो त्या ठिकाणी जरुर तितका मिळत नाही. त्यामुळे तो आपल्या राज्यातून दुसर्‍या राज्यात प्रवेश करतो तेथे आपले कौशल्य दाखवितो. लोकांना प्रभावित करतो व प्रपंच्याच्या राज्यात आनंदी होतो.

अशी राजस्थानी, मध्यप्रदेशी, बिहारी माणसे आपले स्वरुप बदलून इतर राज्यामध्ये जावून तेथे त्या माणसावर प्रभाव पडेल अशी कामे करतात.

असे हे चक्र सदोदी चालू आहे यासाठी बहुरुपाचे काम करण्याची कला माणसाजवळ असणे गरजेचे आहे. कला माणसाजवळ असे गरजेचे आहे.

ही कला म्हणजे त्या राज्यातील लोकांमध्ये असणार्‍या एखाद्या गुणाचे अनुकरण करणे होय.

हे अनुकरण गरजेप्रमाणे कामाचे असेल, कलाकुसरीचे असेल. बोली भाषेचे असेल. जी व्यक्ती यातील एकादा गुण घेवून त्या राज्यात प्रवेश कोल ती आपल्या प्रपंचात आनंदी समाधानी होईल. त्या व्यक्तीचा प्रपंच व्यवस्थित चालू लागेल.

हे झाले प्रापंचिकाचे परमार्थात पण असे बहुरुपी भूमिका साधकाला बजावावी लागते.

साधकाला प्रपंचातील सर्वांना आनंदात ठेवून स्वत:ला स्वानंदाच्या राज्यात घेवून जायचे असते. तेथे त्याला आपले सगे सोयरे, नातेवाईक, मित्र मंडळी यांचा त्याग करुन एकट्याला परमार्थामध्ये जायचे असते. त्यासाठी त्याला अनेक प्रयत्नाची शिकस्त करावी लागते.

हे राज्य म्हणजे स्वानंदाचे राज्य हे आपल्या अतिशय जवळ असते पण आपण त्या राज्यात जाण्याचा कधीच प्रयत्न केलेला नसतो.

आपणाला दूर दूर असणार्‍या राज्याचा मोह झालेला असतो त्यामुळे स्वानंदाचे राज्य आपण दुर्लक्षीत करतो.

ज्यावेळी चिंतनातून त्याला हे स्वानंदाचे राज्य दिसून येते तेव्हा त्याचे विचार चक्र फिरु लागते. तो त्या राज्यात जाण्याचा प्रयत्न सुरु करतो. आपल्या नजीक आपल्याच राज्यात असणार्‍या आनंदाचा शोध घेतो. येथे त्या साधकाची प्रपंचातून परमार्थात प्रवेशाची भूमिका दिसू लागते.

तो तेथे दृढ निश्चयाने आत्मविश्वासाने भक्तीने परमार्थात प्रवेश करतो.

आता त्याची नाटकातील भूमिका त्याला परमेश्वराला सादर करावयाची असते तेथे खोटे चालत नाही तो साधक प्रामाणिकपणे आपली बहुरुपी साधकाची भूमिका तेथे पार पाडतो व त्या परमेश्वराच्या राज्यात स्वानंदाच्या राज्यात आनंदात प्रवेश करतो.

हेच ध्येय प्रापंचिकाचे असते.

म्हणून त्या साधकाला स्वानंदाच्या राज्यात प्रवेश करणारा बहुरुपी म्हटले आहे. हे बहुरुपी रुप आनंदाचे राज्यात साम्राज्य उभे करो ही प्रार्थना.

Leave a comment