शिक्षण म्हणजे ज्ञान देणे-घेणे.
हे काम माणूस आयुष्यभर करीत असतो. त्यासाठी पहिली आवश्यक गोष्ट म्हणजे भाषा. जी भाषा घरात बोलली जाते. समाजात वापरली जाते जी अकलन करणेस सोपी जाते व ज्या भाषेतून आपली संस्कृती सांभाळली जाते ती भाषा, यालाच मातृभाषा म्हणतात.
तेव्हा शिक्षण देत घेत असताना मातृभाषेला महत्व दिले जाते.
शिक्षण :
मातृभाषेतून दिले जाणारे आणि विदेशी भाषेतून दिलेले शिक्षण:
भारतीयासाठी भारतीय संस्कृति राखण्यासाठी मातृभाषेतून शिक्षण घेणे अनिवार्य आहे. हे शिक्षण अगदी खेड्यापासून शहरापर्यंत दिले जाते. या शिक्षणासाठी मोठी आर्थिक तडजोड करावी लागत नाही. विद्यार्थाला पण योग्य मार्गदर्शन व त्याप्रमाणे घरी आचरण करता येते.
पण या वैज्ञानिक युगात विदेशी शिक्षण पद्धतीने शिरकाव केल्यामुळे व पालक व्यवसायाठी गांव सोडून शहराकडे गेल्यामुळे व पति-पत्नी दोघेपण अर्थांजन करीत असल्यामुळे महागड्या शिक्षण पद्धतीचा अवळंब करण्याची त्यांची मानसिकता तयार होते.
त्या ठिकाणी होणारे विदेशी संस्कार, विदेशी पेहराव याकडे पाहून पाल्य व पालक दोघेपण त्या शिक्षणाकडे आकर्षिले जातात.
पति-पत्नी दोघे नोकरी करीत असल्यामुळे शिक्षण व संगोपन या गोष्टीची जबाबदारी पाळणा घरावर सोपविली जाते.
तेथे पाल्य व पालकांमधील दूरी वाढू लागते. गुरुकुलातील संस्कार मुलांवर होत नाहीत. अर्थात भारतीय (देशी) संस्कार अपुरे पडतात.
या शिक्षण पद्धतीमुळे पारंपारिक व्यवसाय जे खेड्यामध्ये चालू असतात ते हतबल होतात. त्यात सुधारणा व उत्पन्न वाढ होत नाही. त्यामुळे जीवनदायी शेती ओस पडत जाते.
वृद्ध माता-पिता हा खेड्यातील व्याप सोडून शहरात जावून राहू शकत नाहीत व शहरात स्थाईक झालेले शेती करण्यासाठी खेड्यात येवू शकत नाहीत. प्रपंचात कलह उत्पन्न होतो.
एकत्र कुटुंबाचे विभजन होते ते नाशाला कारण होते. विदेशी शिक्षणामुळे आई-वडिलांना सोडून मुले परदेशी उद्योग करण्यासाठी जातात व तेथेच स्थाईक होतात.
मृगजळा प्रमाणे यामधून आपणाला सुख शांती मिळेल ही भावना होत जाते पण शेवटी सर्व व्यर्थ वाटू लागते.
पैसा म्हणजे सर्वस्व नाही. तो मिळविणे व पुरविणे ही संस्कृती आहे. पण त्यासाठी वृद्ध माता-पिता कुटुंबीय याकडे दुर्लक्ष करणे ही विकृती समजली जाते.
सारांश रुपाने पहाता मातृभाषेत घेतलेले गुरुकुलात घेतलेले शिक्षण हे उत्तम शिक्षण समजावे.
या शिक्षणाचे पायावर पुढील आयुष्यात त्याला विदेशी शिक्षण अभ्यास प्रगती करता येते.
स्वदेशी शिक्षण पद्धतीचा विचार मनांत पक्का करा, संस्कृती जपण्याचा विचार मनांत ठेवा व मग योग्य दिशेने प्रगती करत करत विदेशी शिक्षण पद्धतीचा वापर करुन घ्या.
स्वावलंबी शिक्षण, मातृभाषेतील शिक्षण हीच खरी शिक्षण पद्धती होय.
शिक्षण पद्धतीतून पैसा हा येतच असतो.त्या पैशाचा योग्य आदर करुन त्या पैशाला जेवढे दूर ठेवता येईल असे संस्कार करावेत.
हीच एक उत्तम शिक्षण पद्धती होईल असे मला वाटते.
1 Comment
Anonymous
मातृभाषेतून शिक्षण घेणे हे सर्वश्रेष्ठ आहेच या शिक्षणातून संस्कृती जपली जाते हेही सत्य आहे. मातृभाषेतील शिक्षणामुळे विद्यार्थी आपल्या मनातले विचार सहज प्रकट करू शकतो तसेच भावनांचा आविष्कार करू शकतो ाश्चात्त्य शिक्षण पद्धतीमध्ये हे त्याला जमतेच असे नाही
डॉक्टर साहेब तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मातृभाषेतून शिक्षण घ्यावेच व आवश्यक तेथे विदेशी शिक्षण पद्धतीचा विचार करावा पूर्णतः त्याच्या आधीन जाऊ नये
म्हणजेच आजची कुटुंब व्यवस्था टिकेल कलह मिटतील आणि पैसा म्हणजे सर्वस्व वाटत राहणार नाही
शिक्षणपद्धतीवर छान विचार मांडले आहेत🙏