गुण पहाता आत्मदर्शन होते. दोष पहाता देह दर्शन होते. जीवन जगत असताना विवेकी माणसांनी उक्तीत सांगितले आहे.
आपली दृष्टी कशी असावी याबद्दल सांगताना मनुष्य मायाचा देह, ही एक खाण आहे. तेथे दोषांचा साठा भरुन ठेवलेला आहे. देहात जस जशी आसक्ती वाढत जाईल तसे तसे त्याचे नाशवंत स्वरुप डोळ्यासमोर येवू लागेल. त्यामुळे त्या देहाला दोषांची खाण म्हटले आहे त्या खाणीकडे त्या दृष्टीने पहा म्हणजे त्या देहाची आसक्ती विषयाची लालसा कमी कमी होत जाईल.
मी एकदा नेत्ररोग तज्ञाकडे गेलो. मला दृष्टीदोष जाणवत होता. डॉ. तंज्ञानी माझ्या डोळ्याची तपसणी केली. लांबच्या अंतरावर बोर्ड ठेवून वाचायला लावले जवळ पुस्तक देवून वाचण्यास लावले. मी जवळचे चांगले वाचू शकलो नाही तेव्हा निरनिराळ्या काचा वापरुन मला चांगला चष्मा बनवून दिला. त्यामुळे मी आनंदी झालो माझी दृष्टी सुधारली.
तेथे माझ्या लक्षात आले देह दोषांची खाण, प्रपंचात पण आपण असे भटकत असतो.
जवळपास खूप दोष फिरत असतात. लोभ, माया मुळे ते दोष आपणास दिसत नाहीत. पण जेव्हा साधु संत-गुरु यांची गाठ पडते त्यावेळी त्या दोषांची खाण नजरे समोर येते व प्रपंचात किती दोष आहेत याची कल्पना येऊ लागते.तेथे पटते देह दोषांची खाण हे लक्षात येते.
त्यावेळी आणखी एक गोष्ट समोर आली ती अशी या खाणीत फक्त दोषच नाहीत तर चांगले गुण पण आहेत. ते आपण पहात नाही म्हणून खोलवर असलेली सोन्याची खाण आपणाला दिसत नाही. तेव्हा माणसाने विवेकाने देहातील दोषांचा त्याग करावा गुणांचा साठा तो खोलवर दडून बसला आहे तो शोधावा. तो साठा शोधण्यासाठी लेन्स बसवावी.
गुणग्राहकता ही लेन्स आपल्या डोळ्यावर बसवावी. यातून जवळच्या व लांबच्या लोकामध्ये असणारे गुण ध्यानात येतील.
जसजशी ही गुणग्राहकता वाढत जाईल तसतसे ते गुण एकत्र येत येत गुणांचा सागर बनुन जाईल. असा हा गुणांचा सागर धीरगंभीर बनून प्रपंचात स्थिर होईल. प्रापंचिकाची चंचलवृत्ती कमी होईल. अशा प्रकारे गुणांच्या सागराचे दर्शन होईल.
मनुष्य हा देहाच्या सौदर्याचा उपभोगीच आहे. सौंदर्यात, स्वादिष्ट पदार्थ यामध्ये तो नेहमी गुंतला जातो पण जेव्हा त्याचे लक्षांत येते की या स्वादिष्ट थोडा….. त्याला ‘मधुमेह ’ झाल. त्याला न बरी होणारी जखम झाली. त्या जखमेची फोड करीत करीत अवयव पण काढण्याची वेळ आली, वेदना असह्य होवू लागल्या, त्यावेळी त्याचे लक्षात येते शरीर ही दोषांची खाण आहे.
जितकी माणसे तितक्याच प्रकृती त्यामुळे प्रत्येक माणसात गुण तसेच दोष भरलेले आहेत. फक्त दोषांकडे पाहू नका. त्याचे गुण पण पहा त्या गुणांची प्रशंसा करा.
ते गुण आपणाकडे कसे येतील. यावर विचार करा तरच जीवन सुख समाधान देईल.
समुद्र पहा ना तो अथांग पसरलेला आहे. पण तो कधीही आपली मर्यादा ओलांडत नाही.