‘शरण’ म्हणजे हार मान्य करणे. दुसर्याचे श्रेष्ठत्व मान्य करणे. आपला अहंकार सोडून देणे, सर्वस्व अर्पण करणे.
प्रपंचात आपण पहातो सकाळी उठल्यावर बागेत जातो, निरनिराळी फुले परडीमध्ये वेचून ठेवतो, घरी घेऊन त्या फुलांचा हार तयार करातो व सुचिर्भूत होऊन ता हार परमेश्वराला अर्पण करतो. ही अर्पण भक्ती होय.
लहान मोठ्या चुकांची फुले घेऊन, त्यांना एका दोर्याने गुंफून, त्यांचा हार तयार करुन, आपली चुक कबूल करुन, आपली हार मान्य करुन, तो फुलांचा हार जगन्नाथ जगदीश्वर ईश्वराला अर्पण करावयाचा. याला शरण म्हणतात.
कालपर्यंत झालेल्या सर्व चुका मान्य करुन ती कर्मे हार रुपाने गुंफून परमेश्वराला अर्पण करणे याला शरण जाणे म्हणतात.
जा नित्यनियमाने असा हार प्रात:काली परमेश्वराला अर्पण करतो त्याला येणारा दिवस त्याला जिंकण्याची वाट दाखवितो.
हार जीत हा प्रपंचातील खेळ आहे. हार झाली म्हणून नाराज व्हायचे नसते व जिंकल्याचा गर्व करावयाचा नसतो. विनम्रपणे हा दोर्यात गुंफलेला हार परमेश्वराला अर्पुन चिंता रहीत व्हायचे असते.
ज्याने या गोष्टी साधल्या त्याचा प्रपंच आनंदमय झाला. कांही वेळा जिंकण्यासाठी पण हरावं लागतं. तो गनिमी कावा असतो.
वरुन साधासुधा बावळट दिसणारा माणूस पाहिला की वाटते हा कसा जिंकणार, पण बाह्य ताकतीकडे लक्ष न देता अंतर्मनाची ताकद वाढवून ईष्ट फल सिद्धी करणारा पण योद्धा असतो.
कोणत्याही ताकतीचा गर्व करु नका. विवेकाने आपली ताकद अजमावून योग्यवेळी योग्य ठिकाणी ती प्रकट करा.
वेळी माघार घ्यावी लागली तरी माघार घ्या, शरण जा, विजयी व्हा..
1 Comment
सौ. शीला केतकर
वेळीच माघार घेणे आणि शरण जाणे महत्त्वाचे.
माणसाला माघार घेणे कमी पणाचे वाटते.हेच वाईट.
🙏राम कृष्ण हरी 🙏