शक्तिशाली बनण्याचे कांही अनमोल नियम

जीवनात विजयी होण्यासाठी, सामर्थ्यवान होण्यासाठी कांही मौलिक नियम घालून दिलेले आहेत.

ते असे

1) सूर्याची लढाई करावयाची असेल तर त्याच्याशी संघर्ष करण्यापेक्षा त्याच्या प्रकाशाचा उपयोग करुन घ्या व आपले बळे वाढवा. थोरा मोठ्यांशी संघर्ष करण्यापेक्षा ते ज्यामुळे मोठे झाले ते गुण आपणात आणण्याचा प्रयत्न करा.

2) आपल्या फायद्यासाठी मित्रांचीच नव्हे शत्रुंचीसुद्धा मदत घ्या. बुद्धीमान मनुष्य शत्रुचा पण फायदा करुन घेउ शकतो तर मूर्ख माणूस मित्राकडून पण दगा फटका घेउ शकतो.

3) आपले प्लॅन आपले उद्दिष्ट आपली प्रगती भावनावश होऊन प्रगट करण्याची घाई करु नका आपण विजयी होईपर्यंत ती गुप्त ठेवा.

विवेकी जो असतो तो आपला विजय आगोदरच सिद्ध करतो. तेवढा आत्मविश्वास त्याचे मध्ये असतो.

4) मौन राखणे फायद्याचे असते. वाचाल बडबडीतून नको ते बाहेर पडते. मोठे लोक कमीत कमी शब्दात आपले शक्तीशाली मत दुसर्‍यासमोर आणतात त्यांचे मत म्हणजे संतांची महंतांची भविष्यवाणी असते.

5) जीवनात मिळालेलं यश, प्रतिष्ठा प्राणाप्रमाणे जपा एकदा कां प्रतिष्ठेवर डाग आला तर रस्त्यावरील सामान्य माणूस देखील तुमचेवर टीका करु लागेल, ती वेळ येऊ देवू नका.

6) क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे हे ध्यानांत ठेवा.

7) आनंदी, भाग्यवान लोकांची सगत ठेवा. दुखी व अभागी लोकांत रहाण्याचे टाळा.

आपण कंजुस प्रवृत्तीचे असू तर उदार, कर्तृत्व असलेल्यांच्या संगतीत रहा त्यांची उदारता तुमचे जवन उजळून टाकील.

8) या जगात वावरत असताना कोण, कुणाला, केव्हा मदत करेल हे सांगता येत नाही. म्हणून कोणाचा कधी अपमान करु नका द्वेष करु नका. जगात चुकीला माफी आहे पण अपमानाच्या जखमेला औषध नाही. अपमानाची जखम विसरु शकत नाही.

9) घरांत एकलकोंडे राहू नका. जगाच्या अगाध पसार्‍या पासूर दूर जावू नका. सर्वांशी मिळून मिसळून रहा.

यातूनच तुम्ही शक्तीशीली व आनंदी बनु शकता.

हे आहेत शक्तिशाली, आनंदी जीवनाचे मौलीक नियम.

Leave a comment