हल्ले-प्रतिहल्ले आपण बरेच पहात आलो आहोत. यातून जागतिक महायुद्धे झाली.
काल माझ्या स्वप्नात नवभारत टाईम्स् या पत्रकात संतापाचा पूर्ण परीवारासह मानवी जीवनावर हल्ला ही बातमी वाचायला मिळाली.
बातमी वाचून मी अधिकच हतबल झालो. आत्ता पर्यंत मी बरेच हल्ले वाचले होते, महायुद्धाच्या कथा ऐकल्या होत्या त्यातून पुढे शीत युद्धे कशी सुरु झाली हे ही ऐकले होते. पण स्वप्नातील ही बातमी थोडी गजबसी वाटली.
स्वप्नात मी विचार करु लागलो की हा संताप कोण आहे ? त्याचा परीवार म्हणजे कोण-कोण आहेत ? व त्यांनी मानवी जीवनावर कसा हल्ला केला ?
हळू हळू मला या युद्धातले एक एक जण ओळखायला येऊ लागले.
प्रथम संतापाची मुलाखात झाली. संताप म्हणजे क्रोध त्याच्याशी लढण्यासाठी माझ्या अंतकरणातील क्रोधाला मी बाहेर काढले.
क्रोध हा महाभयानक अक्राळ विक्राळ राक्षस होता. क्षुल्लक कारणावरुन तो त्याचे अक्राळ विक्राळ रुप दाखवत होता. त्या क्रोधाबरोबर त्याचे बरेच नाते संबंधी पण होते. ते पण त्याची सोबत करत युद्धात सामील होत होते.
तो परीवार म्हणजे माता-पिता, पत्नी, मुले, भाऊ, नातू निर्लज्जता.
पित्याचे नांव घमंडीराम होते. माता उपेक्षा, पत्नी हिंसा मुले म्हणजे वैर, भाऊबंध म्हणजे शिष्यागाळी, नात नातू म्हणजे नासमज बालके.
अशा सर्वांना घेवून संताप व क्रोध मानवी जीवनावर हल्ला करण्यासाठी येत आहेत.
मी झोपेतून खाड्कन जागा झालो. मनांत या युद्ध भूमिची भीती तर होतीच. मग आपण काय करावे असा प्रश्न उभा झाला.
वेळ उष:कालची होती. माझे हात जोडले गेले व मी परमेश्वराला प्रार्थना केली. या युद्धात मला वाचव जगाला वाचव.
तेव्हा तथास्थु असा आवाज माझ्या कानी आला या युद्धात या युद्ध भूमित तुला विजय प्राप्त करावयाचा आहे.
तेव्हा मी सांगतो तसे वाग.
1) प्रथम मला शरण ये
2) तुझी सहनशक्ती वाढत, मौनाचा परीपाठ सुरु कर.
3) सकाळी उठल्यावर आपल्या शरीराकडे पाहून आनंदी हो. त्यामुळे भिती-क्रोध ताण तणाव नामषेश होतील.
तप-उपवास याची सवय कर.
या संताप युद्धातील तीन मुख्य सेनापतीना आपलेस कर पहात आहे.
1) शांत मन, सकारात्मक
2) शक्तीशाली मन युद्ध भूमिविडायासाठी तुझी वाट.