व्यवहारामध्ये आपण साधु संत येती घरा तोची दिवाळी-दसरा माना असे म्हणतो. त्यांचा आदर करतो. पण संत व साधु यांत सूक्ष्म फरक आहे. हे ध्यानांत घेणे गरजेचे आहे. साधु हे सतत परमार्थात प्रगती करण्यासाठी धडपडत असतात. त्यांचा सर्व वेळ ते परमार्थात घालवत असतात. आपल्या गुरुची आज्ञा घेवून सर्व कामे करीत असतात. त्यांना स्वत:च्या इच्छेने कोणताही निर्णय घेण्याची मुभा नसते. ते गुरुच्या आज्ञेत असतात. गुरु म्हणजे संत, हे साधकावस्थेतून वर गेलेले असतात. ते चिंतनशिल असतात. त्यांचे ठिकाणी चंचलता नसते. ते निस्पृही असतात. ते स्वत: जप करुन इतरांचे कल्याण होवो. यासाठी प्रार्थना करीत असतात. त्यांची बौद्धीक पातळी कमालीची वाढलेली असते. ते ज्ञानी झालेले असतात. त्यांचे शब्दाला मोल नसते. त्यांची वाणी प्रभावी असते. ते जसे बोलतात तसेच त्यांचे आचरण असते.
असे संत साधुतून पुढे येतात. साधु हे प्रपंचातून पुढे येतात. प्रपंचाची विरक्ती व परमार्थाची भक्ती हे साधकाचे लक्षण आहे. तर साधनेची विरक्ती व परमार्थाची भक्ती हे संताचे लक्षण आहे.
जैन धर्मामध्ये पंच परमेष्टींचा संदर्भ सांगीतला आहे. अरिहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय व साधु-साध्वी अशा पंच परमेष्टी यांना वंदन सांगीतले आहे. जो या पंच परमेष्टींना नियमित वंदन करतो त्याचे जीवन मंगलमय होते. त्याला सर्व इच्छा, सिद्धी प्राप्त होतात. अशा प्रकारे साधुतून संत जगाच्या कल्याणासाठी जन्म घेतात व मानवता धर्माचे जागरण करतात.
1 Comment
Anonymous
Love all your blogs. They are very informative! Thankyou for sharing such a piece of gold with us