संशय शाप कि वरदान

परमेश्‍वराने माणसास जन्माला घालून कोड्यात टाकले आहे.

प्रत्येक ठिकाणी त्याला विचार करणेस लावले आहे. हा छाप-काट्याचा खेळ खेळण्यास लावले आहे.

पहाता त्याने संशय हा गुण माणसास दिला त्या बरोबर त्या गुणाच्या दोन्ही बाजूपण दिल्या आता कोणत्या बाजूकडे झुकायचे व सुख अगर दु:ख भोगायचे हे माणसाच्या हाती ठेवले आहे.

साधी विवाहाची गोष्ट घ्या मुलगा-मुलगी मोठी झाली, त्यांना सज्ञानावस्था आली. आता लग्न करण्याची वेळ आली तेव्हा तेथे संशय उभा रहातो.

हा मुलगा किंवा ही मुलगी यांचा संसार यशस्वी होईल काय ? यांना चांगली संतती लाभेल का ? या संशयातून माणूस ज्योतीषाकडे जातो तो जोतिषी त्या दोघांची जन्मवेळ, गृहदशा, जन्मनक्षत्र, पाहून आपल्या संशयाचे निराकरण करतो व सांगतो हे लग्न योग्य पद्धतीने लाभदाई होईल. आपण संशय न ठेवता हा विवाह करावा असा सल्ला देतात.

आता हा संशय त्या वर-वधूला वरदान ठरला, आनंद देणारा ठरला.

दुसरीकडे अंधपणाने संशय मनात न ठेवता फक्त सौंदर्य पाहून अंधळे होवून गेलेला मुलगा-मुलगी कोर्टात जावून नोंदणीपद्धतीने लग्न करुन येतात. तेथे तो अंधविवाह होतो. अनेक वेळा तो शाप ठरतो. कित्येक वेळा त्यातून घटस्फोट होतात.

याप्रमाणे संशय घेणे हा गुण माणसाकडे असणे गरजचे आहे. पण तो कुठे वापरायचा व कशा पद्धतीने अवलंबायचा हे शास्त्र प्रत्येकाने अवगत करणे गरजेचे आहे.

नाहीतर प्रश्‍नावर लोंबकळत असणारा दोरखंड साप आहे. असा संशय होवून बसण्यासारखे होईल.

संशय हा गुण विवेकाला वरदान ठरतो. तर अविवेकी माणसाला घात करणारा शाप ठरतो.

Leave a comment