संघर्ष

ज्या ठिकाणी घर्षण होते तेथे संघर्ष उत्पन्न होतो. दोन माणसामध्ये होणारी वादावादी संघर्ष घडवून आणते. खेळात प्राविण्य मिळविण्यासाठी केलेली धडपड संघर्ष समजला जातो. कोणतीही स्पर्धा संघर्षणा शिवाय होवू शकत नाही. संघर्षासाठी प्रयत्न, चिकाटी गरजेची असते.
प्रपंचात काय किंवा परीवारात काय ज्या ठिकाणी अनेकजण एका ठिकाणी येवून आपल्या मनाप्रमाणे कार्यसिद्धीचा प्रयत्न करतात तेथे संघर्ष घडतोच. तेथे स्पर्धा रौद्र रुप धारण करते व त्या संघर्षातून घराची वाट लागते.
कांही व्यसनी माणसे व्यसनाधीन होवून प्रपंचात संघर्ष करीत रहातात. मुलाबाळांकडे बायकोकडे लक्ष देत नाहीत. मुलांचे शिक्षण त्याचेवर संस्कार या गोेष्टी परीवारात होत नाहीत. या गोष्टींची जेव्हा बालकांना जाग येते, तेव्हा चांगले शिक्षण घेणे गरजेचे आहे हे बालकास व मातेस कळू लागते. तेथे जगण्यासाठी, शिक्षणासाठी संघर्ष करणेस माता-बालके तयार होतात व प्रयत्नांती परमेश्‍वर या उक्तीप्रमाणे त्या बालकाला शिक्षणात चांगले यश मिळते. त्याचे पदवी नंतरचे शिक्षण पार पडते. त्याला चांगली आयटी क्षेत्रात नोकरी मिळते व त्याची प्रपंचात स्थिरता होत जाते. हा सर्व प्रकार संघर्षाशिवाय होऊ शकत नाही. तेव्हा यशस्वी जीवन जगणेसाठी प्रत्येकाला संघर्ष हा करावाच लागतो. आयुष्यात काही प्रगती करावयाची असेल, उन्नती साधावयाची असेल तर संघर्ष करणे गरजेचे असते.
इच्छित ठिकाणी पोहजणेसाठी दोन पाऊलांना एकमेकांशी संघर्ष करावा लागतो. अखंड समुद्रात पोहायचे असेल तर शरीराला पाण्याशी संघर्ष करावाच लागतो. दोन मल्लांची कुस्ती ही शरीर सौष्ठव बघून होत नाही तर त्या दोघामध्ये सघर्ष होवून जो जिंकतो त्याची सरशी होते. तिर्थयात्रा, दूरचे प्रवास हे सुद्धा नुसत्या पैशानी होत नाहीत, तर तेथे वहानांशी संघर्ष करावा लागतो.
संघर्षामुळे जशी उन्नती साधता येते, तसे संघर्षामुळे कांही धोके पण होवू शकतात. त्या धोक्यांचापण विचार करणे गरजेचे आहे. खिशात काडीपेटी आहे संघर्षामुळष काडीतून एकाद्या गरीबाची गवताची गंज पेट घेऊ शकते व त्यामुळे त्याचा प्रपंच धुळीस मिळू शकतो. तर तीच काडी गरीबाच्या घरातील चुल पेटवून त्याला दोन घास सुखाचे खाण्यास मदत करु शकते.
एकाच कुटुंबामध्ये असलेले सर्वजण कर्तृत्ववाण, बुद्धीवान असतात असे नाही. पाची बोटे सारखी असतात असे नाही, तर त्यांनी एकमेकांशी संघर्ष न करता एकीचे बख दाखविले तर समाजात त्यांची महती सांगितली जाईल. या ठिकाणी संघर्ष होत असताना साधकाची विवेकबुद्धी जागृत होणे गरजेचे असते. त्या त्या व्यक्तीचे कर्तृत्व पाहून त्याला त्याचे योग्य काम देणे गरजेचे असते. यातून होणारा संघर्ष, प्रपंचातील कलह टाळला जाईल व तो खरा प्रापंचिक होईल. सतत प्रयत्न करीत रहाणे याला संघर्ष म्हणतात. देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून सतत केला गेलेला प्रयत्न म्हणजे संघर्ष होय. अनेक देशभक्तांनी संघर्ष केले व ते देशाच्या इतिहासात अढळ झाले. कुणी मिठाचा सत्याग्रह केला, कुणी भूसंपादनाचा संघर्ष केला, कुणी स्वराज्य स्थापणेचा संघर्ष केला. या सर्वामागे त्यानी केलेला संघर्ष महत्वाचा आहे. आपण सर्व जेष्ठ नागरीक प्रपंचातील साठ वर्षे किंवा अधिक काळ अशा प्रकारे प्रापंचिक संघर्ष करीत करीत येथपर्यंत आलो आहोत. आता शरीराने आपल्या ठिकाणी संघर्ष करण्याची ताकद राहिली नाही तरी मला वाटते आपण मानाने संघर्ष करीत राहिले पाहिजे.
संघर्ष करीत असताना या संघर्षाचा ब्रेक(लगाम) जेष्ठांचे हाती असणे गरजेचे आहे. शाब्दीक संघर्ष टाळण्यासाठी मौन, शारीरीक संघर्ष टाळण्यासाठी मीत आहार, वैचारिक संघर्ष होवू नये म्हणून ध्यान, धारणा केली पाहिजे. प्रपंचातील आपली भुमिका नक्की केली पाहिजे. या सर्व गोष्टी वेळचे वेळी करत गेलो तर संघर्षातून समृद्धी निर्माण होईल व तुमच्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलून जाईल. तेथे जीवनाचा शोध झाल्याचे समाधान लाभेल.

Leave a comment