मुष्याची साधना- प्रयत्न हे आयुष्यभर चालू असतातच. त्या प्रयत्नांनी चांगले यश, चांगली उन्नती, वैभवाचे शिखर प्राप्त होते.
ते नुसत्या प्रयत्नाने नाहीतर त्या प्रयत्नाबरोबर तो जे साधन, जी संगत धरतो त्यावर अवलंबून असते. येथे संगत म्हणजे साथ, जोड असा अर्थ घेतला आहे.
एखादा खुप श्रीमंत असतो. पण पैशांच्या गर्वामुळे त्याला संगत अनेक व्यसनांशी होते. तो दारु पिऊ लागतो, अनाचार करु लागतो व सर्व संपत्तीचा नाश करुन टाकतो. येथे त्याच्याकडे नाही पण त्याच्या संगतीकडे लोक पहातात.
‘संगती संग दोषेन’ या उक्तीप्रमाणे त्या व्यक्तीचे यश अथवा अपयश अवलंबून असते. त्यामुळे साधकाने संत सांगती ठेवणे गरजेचे आहे.
एकदा संत संगती लाभला की मनुष्याचे जीवन बदलून टाकते.
प्रवासाचेच पहाता आपणांस सात समुद्र पार करुन इंग्लंड, अमेरिका, युरोप गाठायचे असेल तर आपणाला वायुयानाची संगत करावी लागते.
तेव्हा संगत ही फार महत्वाची गोष्ट आहे.
प्रपंच उत्तम करावयाचा असला तर पत्नी, मुले, बाळे यांची संगत महत्वाची आहे.
आयुष्याचे प्रत्येक टप्यावर संगत ही महत्वाची बाब आहे. असे संत बजावून सांगत आहेत.
तेव्हा जीवनात चांगली संगत धरा व चांगल्या पंगतीचा लाभ घ्या.
1 Comment
सौ. शीला केतकर
साधनेमध्ये जर चांगल्या व्यक्तींची संगत असेल तर साधना निश्चितच परिपूर्ण होते.
साधनेमध्ये निगेटिव्ह विचाराच्या व्यक्ती नसाव्यात.
आपण म्हणता त्याप्रमाणे संसार करत असताना सुद्धा आपली पत्नी मुले यांचे उत्तम संगत असेल तर संसार परिपूर्ण होतो👍
🙏 राम कृष्ण हरी🙏