धर्म म्हणजे आचार, विचार. ज्यांचे आचार विचार , आहार एकमेकांंना जुळणारे असतात. त्या तिथे साधर्मिक भक्ती जागृत होते.
जैन धर्मामध्ये भक्तीचे प्रकार सांगीतले आहेत.
1. साधर्मीक भक्ती,
2. अनुकंपा भक्ती,
3. जीवदया भक्ती,
4. दास्य भक्ती,
5. अहंकार भक्ती,
6. माया भक्ती.
कोणावरही कळत व कळत झालेले अत्याचार उलटून परत जीवनात त्याची फळे देत असतात, म्हणुन भक्तिभावाने केलेल्या कर्माचे फळ आपणास नेहमी चांगलेच मिळते.
यातील साधर्मिक, अनुकंपा, जीवदया या भक्तीतुन समाज, स्वजन संबंधी, प्राणीमात्रांची सेवा, मदत, गरज, भागली जाते.
अहंकार, माया यांचे भक्तीतून प्राणीमात्राची हिंसा अत्याचार होतात.
तेव्हा काया, वाचा, मने कुणावर अत्याचार होणार नाहीत. हे बघणे म्हणजे साधर्मिक भक्ती होय.
अन्न-वस्त्र-निवारा या माणसाच्या तीन प्रमुख गरजा आहेत. सर्व प्राणीमात्रात एकच परमात्मा वास करतो तर सर्वांसाठी सुखाची प्रार्थना करणे ही पण एक साधर्मिक भक्तीच होय.
भोजनाचे वेळी आलेल्या अतिथीला भोजनाचा लाभ देणे, त्याची गरज लक्षात घेवून त्याला जरुर ती मदत करणे याला साधर्मिक भक्ती म्हणतात.
माणसाच्या अंगावर आलेली छोटीशी मुंगी पण माणूस जागृत होवून दूर करण्याचा प्रयत्न करतो. त्याप्रमाणे एकात्म्य असलेल्या प्राण्यावर आलेले संकट लक्षात घेऊन त्यावर त्वरीत मदतीचा हात देणे ही साधर्मिक भक्ती होय.
मूक प्राणी देखील ही भक्ती करतात. जन्माला येणार्या पिलासाठी जन्माअगोदरच घरटे बांधून तयार ठेवतात. त्याची चिंता करतात.
मनुष्य ही चिंता इतर मानवासाठी का करीत नाही?
हा मानवता वाद म्हणजे साधर्मिक भक्ती होय.
आपल्याजवळ असलेल्या संपत्तीवर गोर गरीबांचा हक्क आहे. योग्य वेळी इतरांना मदत करून आपण त्यांचा दुःखाचे भागीदार बनुन त्यांना इच्छित सुखाच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांच्यावर वेळ येताच आपण त्यांना मदत करावयास हवी.
त्यामुळे साधर्मिक भक्तीची वाढ होते, चांगल्या संस्काराचा लाभ होतो…