प्रत्येक माणूस उठल्यापासून रडगाणी करायला सुरवात करतो.
मला हे नाही, माझे कसे होईल ?
प्रत्येकाला आताच्या या महामारीत अनेक प्रश्न यश म्हणून उभे रहातात. कुणाला डॉक्टर विलगीकरण करतात, कुणाला कृत्रिम श्वासाठी हॉस्पिटलमध्ये रहाण्याचा सल्ला देतात. कित्येकांना घरांत कोंडून घ्यावयाला लावतात.
अशा परस्थितीत या अडचणीतून आपण कसे सुरक्षीत आहोत व आपणाला परमेश्वराने किती किती दिले आहे हे आपण लक्षात घ्यावयाला पाहिजे.
मी म्हणतो या कोरोनाच्या काळात मला विलगीकरणासाठी स्वत:च अस घर आहे, त्यासाठी मला पैसे मोजुन विलगीकरण केंद्रात जाण्याची गरज नाही.
ही परमेश्वराची कृपाच आहे. तसेच दोन्ही वेळा पोट भरेल इतके अन्न आहे, ही पण देवाचीच कृपा म्हणायची.
मनोरंजनासाठी टी.व्ही. आणि इंटरनेट आहे. त्यातून जे हवे ते मनोरंजन साधता येते.
एक फोन केला तर हवी ती वस्तु समोर येते ही पण परमेश्वराची कृपा होय.
हातात मोबाईल दिला आहे. बातम्यासाठी व्हॉट्स अप आहे, वाचनासाठी पुस्तकालय आहे.
बँक खात्यात जरुरी पुरते पैसे आहेत. प्रेमाने जवळीक साधणारी नाती आहेत. ही पण भगवंताची देणगी आहे.
अशा वेळी मला हे नाही ते नाही असे म्हणत रडत का बसायचं.
कित्येकजाण या पैकी काहीही जवळ नसताना कसे जगत असतील?
त्यांच्याकडे वरील पैकी एकही गोष्ट नसताना शरीर व मन साथ न देता कसे दिवस काढत असतील?
तेव्हा परमेश्वरा मी तुझा ऋणी आहे. तु जे कांही मला दिले आहे त्या बद्दल आता थोड तू शिल्लक ठेवून ज्यांचे जवळ कांही नाही त्यांना दे, हीच प्रार्थना.