या करोनाच्या लॉक डाऊन मध्ये वेळ घालवीणे अवघड वाटत होते. आम्ही त्याकाळात पत्याचा डाव खेळू लागलो.
तो डाव खेळताना संपूर्ण पत्याचा डावच समोर आला. एक एक पानाचा मी विचार करु लागलो.
प्रथम समोर आले ते दुर्रीचे पान.
दूर्री म्हणजे दूरवर पसरलेली पृथ्वी व आकाश.
नंतर आली तिर्री – सृष्टीचा निर्माता, संचालक, संहारक – ब्रम्हा, विष्णु व महेश.
नंतर सामोरे आली चौरी (चौकी) पुराणातील चार वेद.
नंतर समोर आली पंजी म्हणजे शरीरात वास करीत असलेले पंच प्राण – प्राण, अपान, उदान, हृदय, नाभी.
नंतर समोर आली छक्की तिने आपणासोबत सतत सोबत करणारे षडविकार- काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, अहंकार.
नंतर समोर आली सत्ती – या विश्वाला वेढून टाकणारी सात समुद्राची माया.
नंतर समोर येते अठ्ठी – अठ्ठी म्हणजे जीवनातील अष्ठ सिद्धी ज्याचे जवळ ही अठ्ठी असते तो भाग्यवान समजला जातो.
नंतर येते नव्वी हे नवग्रह आपल्या दैनंदिन जीवनावर लक्ष ठेवून असतात व योग्य वेळी आपला प्रभाव दाखवितात.
यानंतर दिसते दश्शी – दश्शी म्हणजे आपली दहा इंद्रिये पांच कर्मेंद्रिये व पांच ज्ञानेंद्रिये.
आता समोर येतो तो गुलाम आपल्या मनांत येणार्या वासना, इच्छा यांचा माणूस गुलाम होतो.
मग प्रवेश होतो तो राणीचा. राणी म्हणजे ‘‘माया’’ सर्व प्रपंचात मोहजाळ पसरवून सर्वांनाच आपले आधीन करणारी ही राणी होय.
यानंतर स्वार होवून हुकमत गाजविणार्या सर्वांना आपल्या आधीपत्त्यात घेवून त्यांचे वर राज्य करणार्या राजाची.
त्याला राजेपण मिळाल्यामुळे एक प्रकारची धुंदी आलेली असते. त्याच्या हातात आलेल्या सत्तेचा थोडा माज आलेला असतो.
सर्वत्र अंदाधुंदी, अनाचार माजला असताना दडलेला एक्का समोर येतो. तो प्रकट झाल्यामुळे सर्वच आनंदी आनंद होतो.
त्याला शरण गेल्यामुळे सर्वत्र सुखी जीवन सुरु होते. एके वेळी लपून, लाजून बसलेला एक्का आता उजळ माथ्याने प्रगट झाला.
त्याने पत्त्याचा डाव जिंकला हा एक्का म्हणजे विवेकी माणूस अशा प्रकारे दशविर गुलामाचा पगडा असतो.
वासनाच इंद्रियांना नाचविते. ही वासना उत्पन्न होते मायेमुळे.
तिच्या नादाने वाहवत जाते ते मानवाचे मन.
या खेळामध्ये माणूस म्हणजे राजा.
तो महत्वाचा आहे. तो या सर्वांवर नियंत्रण करणारा असतो. पण तो पण अहंकारामुळे उन्मत्त झाला तर त्याला मुठीत ठेवणारा जो असतो तो एक्का होय.
अशा प्रकारे प्रपंचात आपण आपल्या कर्मावर कसा विजय मिळवितो व ते कर्म कसे अर्पीते करावयाचे, हे त्याच माणसाने साध्य करावयाचे असते.
म्हणून पत्ते खेळत खेळत मला आठवलेल्या दोन ओळी मी अर्जवून तुम्हाला सांगत आहे.
‘‘राजाने माजू नये, एक्क्याने लाजू नये’’