प्रपंच

प्रपंच हे पाच जणांनी मिळून करावयाची साधना आहे. आई, वडील, बायको, मुले ज्या ठिकाणी एकत्र राहून कार्य करतात त्याला घर प्रपंच म्हणतात. त्यांनी एकत्रित होऊन केलेले काम या संसार म्हणतात.

घरचा प्रपंच पाहून आपण गाव प्रपंचाकडे जावू. गावगाडा पण एकट्याने हाकता येत नाही. तेथे पण सर्व मंडळी एकत्र येतात व गावप्रपंच थाटतात. जो माणूस चार माणसे एकत्र करुन कार्यसिद्धी करतो त्याला बलवान म्हटले जाते. असाच सुखी समाधानी मनुष्य परमार्थात जाणेस योग्य ठरतो.

तो हळूच कुणाला न कळत प्रपंचातून विरक्त होतो व कुणाला न दुखविता परमार्थात प्रवेश करतो. तेथे त्याला इतरांची गरज, मदत, दया नको असते. तो स्वबळावर पुढील वाटचाल करीत असतो.

प्रपंचातच त्याने असे एकटे काम करण्याची, एकांतात जाण्याची तयारी केलेली असते. जो प्रपंचातील नाती गोती संबंध हळुवारपणे त्यागुन परमार्थात प्रवेश करतो तो खरा परमार्थी होय. आणि ज्याला हा विवेक हवा असेल त्याने प्रपंच हा परमार्थात जाण्याचे साधन असे समजून प्रपंच करावा.

प्रपंच हे साध्य होऊ शकत नाही. त्यामध्ये काही तरी कमतरता रहातेच. तेव्हा प्रपंच हा विवेकी माणूस चांगला करु शकतो.

आपण विवेकी व्हा. प्रपंचाच्या तिसर्‍या टप्यावर आल्यानंतर कुठे थांबायचे, काय करावयाचे, कुणाला काय सुचवायचे याचा विचार जेष्ठांनी करावयाचा असतो व जो हा विचार मनात ठेवतो तो यशस्वी होतो, त्याचा प्रपंच आनंदी होतो.

1 Comment

  • सौ. शीला केतकर
    Posted November 19, 2022 5:59 pm 0Likes

    प्रपंच विवेकाने केला की परमार्थ आपोआपच साधतो.
    प्रपंच करताना हळूहळू त्यातून निवृत्ती घेणे व मन परमार्थाकडे वळवणे हे खरे आहे.
    पण ते साध्य होणे अवघड आहे🙏 राम कृष्ण हरी🙏

Leave a comment