प्रमाणात सर्व काही असावे

प्रपंचात उन्हाळा, हिवाळा, पावसाळा असे तीन ऋतू दरवर्षी आपण पहात असतो. उन्हाळा माणसाला धगी मुळे असह्य वाटतो. हिवाळा फार थंडीमुळे बोचरा वाटतो, तर पावसाळा सुगी शेतीची कामे झाल्यामुळे आता आपला आश्रयदाता पांडुरंग यांचे भेटीसाठी तयार होतो. प्रत्येक गावा गावांतून ही परमेश्‍वराची वारी पंढरपूरकडे वाटचाल करीत असते. यामध्ये तरुण, वृद्ध, साधक भक्तीने सामील होतात. तेव्हा त्यांच्या तोंडी पांडुरंगाचे नाव असते व या नामाच्या जोडीने पंढरपूरच्या दिशेने वाटचाल चालु होते.
कळत नाही आपण केव्हा पांडुरंगाचे पायाशी पोहचलो. असे हे नामाचे महत्व आहे. यासाठी फक्त मुखी नाम असणे गरजेचे आहे.
आपण नाम घेता घेता पायाने केव्हा पांडुरंगाचे समोर उभा रहातो हे कळत नाही. म्हणून म्हटले आहे ‘नाम घेता वाट चाले’.

Leave a comment