पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभुते आहेत. तसेच एकेंद्रिय, बेइंद्रीय, त्रिइंद्रीय, चौरेंद्रिय, पंचेद्रिय असा मानव आहे.
पंचमहाभुते व मानव यामध्ये बरेच साम्य दिसून येते. किंवा पंचमहाभूतातून मानवाची निर्मिती होते व मानव मृत्यूनंतर पंचमहाभूतात विलीन होतो व तेथून पुन्हा मानवाचा पुनर्जन्म सुरु होतो.
असे कालचक्र अनादि काळापासून चालू आहे. आता पंचमहाभूतातील एक एक गुणांचा आपण विचार करु.
प्रथम पृथ्वी तत्व : पृथ्वीतत्व म्हणजे जड तत्व. या जडातून म्हणजे दगड धोंडे, पर्वत यातून एकेंद्रियांची निर्मीती होते या तत्वामध्ये कोणतीही जाणिव नसते.
आता आप या पंचमहाभूताचा विचार करु. आप म्हणजे पाणी.
जलतत्व : यातून बेइंद्रियाची निर्मिती होते. दोन इंद्रिये असलेले प्राणी, दोन डोळे, दोन कान, दोन हात, दोन पाय, अन्नग्रहण व विसर्जन करणारे प्राची यांची उत्पत्ती ही जलतत्वामधून होते. जलतत्व हे भावनिक तत्व आहे. आश्रृ, रुचि या सर्व गोष्टी जलतत्वामुळे होतात. अन्न ग्रहण, पचन, विरेचन या गोष्टीसुद्धा जल(आप)तत्वा मुळे होतात.
तेज – हे अग्नितत्व आहे. याचा मालक सूर्य आहे. सूर्यापासून उर्जा मिळते, अन्न शिजवले जाते. त्याने पचन होते व शरीरयष्टी सांभाळली जाते. या तेज महाभुतातून चैतन्य, विद्या, यश प्राप्ती होते. विज्ञानातील प्रगती ही तेजा मुळेच दिसते. भौतिक व वैज्ञानिक प्रगती ही याच तत्वामुळे होते. मोटार-रेल्वे-विमान-वायूयान ही सर्व साधने तेजाच्या साद्याने कार्यान्वीत होतात.
क्रोध – वायु – वायु – वारा हे पंचमहाभूतातील चौथे तत्व आहे. या तत्वामुळे शितलता उत्पन्न होते. भर उन्हात झालेली तगमग दूर करण्यासाठी वापरण्यात येणारे पंखे, एसी, कुलर यांची निर्मिती वायू तत्वातून होते. या तत्वातून जीवनात अस्थिरता उत्पन्न होते. मनुष्य वात प्रकृतिचा अस्थिर प्रकृतीचा वाटतो. या प्र्रकृतीची माणसे चिडचिडी असतात. ती घडीत चिडतात तर दुसर्या घडिला शांत होतात.
आकाश – हे पंचमहाभुतातील पाचवे तत्व आहे. आकाश म्हणजे भव्यता. अमर्यादित वैभव ज्याची कशाशी पण तुलना होवू शकत नाही. असे तत्व म्हणजे आकाश. हे तत्व अनंत, अविनाशी आहे. हे सृष्टीत सर्वत्र एकच एक असे दिसून येते. जिकडे पहावे तिकडे ते दिसते. ते नाही अशी कोठे जागा सापडत नाही. तेव्हा हे एकत्व दर्शवणारे तत्व म्हणजे दैवत. देव तत्व होय. या तत्वाला दुजाभाव नाही. हेच मोक्ष, हेच स्वर्ग होय.
आता या पंचमहाभूतातून बेरजेने दोन दोन तत्वांच्या – प्रकृति मानवामध्ये दिसतात. सत्व, रज, तम त्यातून मानव कसा आहे हे दर्शवणारे सात्विक, राजस, तामस हे प्रकार आपण पहातो.
आता ही पाच ही तत्वे व सात्वीकता धारण करुन जीवन जगणारा मानव हा खरी चिरंजीव पदाचा मानकरी होतो तसे चिरंजीव पद प्राप्त करण्याचा प्रयत्न मानव जन्मामध्ये प्रत्येकाने करावा.