ओम ‘ॐ’ हा शब्द तीन अक्षरातून तयार झाला आहे. ही तीन अक्षरे म्हणजे ‘‘अ’’ ‘उ’ ‘म’.
ॐ या शब्दातून आध्यात्माची सुरवात होते. त्या शब्दात अध्यात्माचे बीज पेरले जाते. तेथून मोक्ष साधनेचे लक्ष साध्य केले जाते.
या ॐ मध्ये पंचपरमेष्टी म्हणजे अरिहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय व सर्व साधु संत येतात.
तसेच ब्रम्हा, विष्णु, महेश या दैवतांच्या प्रयत्नांचे द्योतक या ॐ मध्ये आहे. ॐ हे परमेश्वराचे स्वरुप आहे.
शास्त्रातील व परमार्थातील उच्च पद कोणते असेल तर ते ॐ होय.
या पदाच्या उच्चाराने तयार होणार्या लहरी शारीरिक, मानसिक व ॐ यातील ‘‘अ’’ या अर्थ आहे. अनंत अनंताकडे ‘उ’ चा अर्थ आहे वर नेणारा, ‘म’ चा अर्थ आहे मौनात नेणारा (असणारा) म्हणजेच अनंताकडे वर नेणारा. साधनेत मौन ठेवणारा हा ॐ होय.
ॐ च्या उच्चाराने संपूर्ण वातावरणाची शुद्धी होते त्यातून एक संरक्षक कवच निर्माण होते.
ॐ चा ध्वनी वातावरणातील दुषीत जीवणूंना दूर करतो व वातावरणात चैतन्य आणतो.
ॐ ची ओळख तीन प्रकाराने होते काया-वाचा-मने , पठणाने-उच्चाराने ध्यान धारणेने आपण मानसिक भावना, संस्मरण त्यातून उत्पन्न होणारी उर्जा आपल्या मस्तकामध्ये प्रवर्तीत करतो.
सकाळच्या वेळी सूर्योदयाच्या समयी केलेले हे चिंतन एकाद्या शक्तीवर्धक टॉनीक सारखे वाटते.
जर आपणाला अनंत अशा परमात्याचे चरण गाठावयाचे असेल तर आमच्या जवळ ॐकारचे धनुष्य व मनरुपी बाण असणे गरजेचे आहे. या धनुष्य व बाण रुपी साधनेतून परमात्मा प्राप्ती होईल.
शरीर तणाव रहित रहाण्यासाठी ॐ म्हणा. यामुळे हृदय व रक्ताभिसरण संतुलीत रहाते. बी.पी सारखे आजार संतुलीत केले जातात व बी.पी. मुळे येणारे अनेक दुष्परिणाम टाळले जातात.
‘ॐ’कार पठणातून थायरॉईड ग्रंथीच्या सकारात्मक उर्जेचा उदय होतो व तो मानसिक संतुलनाचे कार्य करतो.
‘ॐ’कार उच्चाराने घाबरटपणा-भिती नाहीशी होते.
आत्मविश्वास जागृत होतो. पचनशक्ती वाढते. असा हा ‘ॐ’काराचा उच्चार नाभी चक्रा पासून होतो.
तेथे स्थित असणार्या सर्व पाचक ग्रंथी उत्तेजीत होतात व शरीरात चांगली पचन संस्था काम करु लागते.
शरीरात चैतन्य, उत्साह उत्पन्न करणे श्रमीका मध्ये श्रम करण्याची ताकद देणे या गोष्टी ‘ॐ’ कारामुळे
होते, थकवा जातो.
‘ॐ’कार पठणाने निद्रानाश रोगावर यशस्वी उपचार होतात.
क्षय रोगासारखे फुफुसाचे आजार दूर होतात. रोग्याची प्रतिकार शक्ती वाढते.
‘ॐ’काराचा जाप माणसाला अज्ञानाने अंध:कारातून ज्ञानाच्या उर्जेकडे जाण्याचा मार्ग दाखवितो.
‘ॐ’कार पठणाने पारमार्थिक क्षेत्राची दारे उघडली जातात.
संपूर्ण वातावरणाची शुद्धता व रक्षण केले जाते. दूषीत जीवाणूंना दूर केले जाते. उद्बत्तीच्या सुगंधा प्रमाणे सर्व वातावरण सुगंधीत केले जाते.
‘ॐ’काराचे नित्य पठणाने आपण परमोच्च ईश्वरी सत्तेशी एकरुप एकजीव होवू शकतो.
योगी पुरुष ‘ॐ’काराचे ध्यान करीत संसार सुखा बरोबर मोक्ष सुख प्राप्त करतात.
ॐकार बिंदू संयुक्तंम्, नित्यं ध्यायंती योगीनाः,
कामदं मोक्षदं चैवं, ॐकाराय नमो नम: ॥
तेव्हा हा ॐकार शब्द लहान असला तरी त्यात मोठा अर्थ सामावला आहे त्या ताकतीने आपण मोक्ष प्राप्त करु शकतो.
1 Comment
सौ. शीला केतकर
ओंकार साधनेचे फायदे फारच छान पद्धतीने सांगितले आहेत.
आपण ओंकार साधनेचा दिलेला श्लोक मी लिहून घेणार आहे मला फारच आवडला.
ओंकार साधनेतूनच परमोक्षबिंदू पर्यंत आपण जाऊ शकतो हे अगदी सत्य आहे.