नको पाहू आता अंत रघुराया

रघुरायाला म्हणजे परमेश्‍वराला ही आर्त विनवणी साधक करीत आहे.

प्रपंचातील धकाधकीला कंटाळून शेवटी सर्वांचा रक्षक जो प्रभु-रामराया त्याला साधक आर्त हाक घालत आहे.

परमेश्‍वरा आता हे सर्व हाल सोसण्याची माझी हद्द झाली. मी आता या जंजाळातून बाहेर पडावे म्हणत आहे.

त्यासाठी मी अखंड तुझे नामस्मण करीत आहे. तरीही तुझे दर्शन होत नाही. मला तर हा प्रपंच सोडून तुझी सेवा करावी वाटत आहे. मी तुझी आर्त भक्ति करीत आहे. असे असूनही तुझे दर्शन होत नाही. तेव्हा मी हतबल झालो आहे. माझा शेवट समिप आला आहे. आता तरी तू मला प्रसन्न हो व दर्शन दे. तुझ्या दर्शनासाठी माझे नेत्र आतुर झाले आहेत.

अशी आर्त हाक ज्या ज्यावेळी साधकाने परमेश्‍वराला केली तेव्हा तो जगनायक धावत त्या साधकाचे मदतीस आला.

आपण अशा हतबल अवस्थेत परमेश्‍वराला विसरुन जातो. त्याला आळवायचे राहून जाते व मग शेवटी तोंडातून येते‘ नको पाहू अंत आता रघुराया’.

आज आपण सर्वजण करोना महामारीने त्रस्त झालो आहोत. पण घरांत बसून जगन्नायकाला आर्त हाक घालत नाही. त्यामुळे ही महामारी आटोक्यात येत नाही.

आपण सर्वांना या महामारीतून मुक्तता हवी असेल तर परमेश्‍वराचे नित्य चिंतन करा, मनन करा, विवेकी बना. कोठे बाहेर पडू नका, तो परमेश्‍वर नक्की तुमच्या मदतीला धावून येईल.

विश्‍वास ठेवा कितीही वेळ झाला तरी तो तुमच्या मदतीला धावून येणार आहे. प्रसंगाला कंटाळून नामस्मरण सोडू नका. नामस्मरणात तुम्हाला वाचवणार आहे.

तुमचा अंत समाधानात, शांततेत होणार आहे. तुम्हाला सद्गती मिळणार आहे.

Leave a comment