परमेश्वर सेवेच्या अनेक युक्ती सांगीतल्या आहेत. ‘दास्य भक्ती’ ही त्यातील महत्वाची सेवा होय.
एकदा कां ही दास्यभक्ती अंगी रुळली, की काम झाले. ती व्यक्ती तेथे दास्यत्व स्विकारते, अभिमान अहंकार यांचे विसर्जन करते व जीवनांत ज्या ज्या ठिकाणी मदत करता येईल अशा ठिकाणचा शोध घेवू लागते.
हा शोध घेता घेता त्याचा अभिमान पार निघून जातो. हे मी केले नाही, परमेश्वराने माझ्याकडून करवून घेतले आहे व त्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो, अशी भावना त्याची तयार होते.
तेथे निराभिमानी परोपकार दिसून येतो व हा भाव परमेश्वराला आवडतो. परमेश्वर अशा साधकाला जवळ करतो. त्याची भक्ती परमेश्वर चरणी रुजू होते.
अशा अर्थाची श्री. आनंदा शंकर ननावरे यांची एक कविता समोर आली ती अशी-
गीत तुझे गाऊ कसा । मनांतील वेदना सांगु कसा ।
ह्रदयातील सूर तुला ऐकवू कसा, मुके झाले शब्द आज, गीत तुझे गाऊ कसा ।
भंगले स्वप्न, विसरले शब्द आज, गीत तुझे गाऊ कसा ।
चांदण्या रात्री दिली घेतली वचने, भेटीतील सुगंध क्षण विसरु कसा..
मुके झाले शब्द आज, गीत तुझे गाऊ कसा ।
अशी ही दास्यभक्ती म्हणजेच परमेश्वर भक्ती आपणाला फार काही सांगुन जाते. जीवन जगत असताना अभिमान अहंकार घेऊन जगू नका.
काम, क्रोध, मोह, माया यांचा अभिमान ठेवू नका. दूसर्यावर केलेले उपकार ध्यानांत ठेवू नका. मात्र दुसर्याने आपल्यासाठी केलेले उपकार कधी विसरु नका. ते फेडण्याचा प्रयत्न अवश्य करा.
अशा साधकाला परमेश्वर जवळ करतो.
निराभिमानी बना, परोपकार करा हीच खरी परमेश्वर सेवा आहे.
2 Comments
समीर भंडारी
मन प्रसन्न करणारी चिंतेने
सौ. शीला केतकर
अगदी बरोबर.
अभिमान न धरता परमेश्वर सेवा श्रेष्ठ.माणूस आपण केलेले उपकार काढून दाखवतो.
म्हणजे परत अभिमानात जातो व परत अहंकाराला जोपासतो.
🙏 राम कृष्ण हरी🙏