कोणत्याही गोष्टीत दिरंगाई करु नका. आजचे काम आजच करा डींळींलह ळप ढळाश डर्रींश’ी छळपश वेळेत केलेले काम पुढे येणारे संकट टाळू शकते. या अर्थाने म्हण्टले आहे.
नंतर ते अंतर वाढते
जीवनात पण असेच आहे. श्नय आहे तो पर्यंत आयुष्याची मजा अनुभवा ती मजा नंतर घेऊ असे म्हणत बसू नका कारण नंतर त्या सुखात अंतर पडत जाते. कोणत्याही गोष्टीची जबाबदारी घेताना आपण ती पेलू शकू कां ? याचा विचार करा. नंतर विचार करुन उपयोग नसतो. नंतर बैल गेला झोपा केला अशी स्थिती होवे. कुठे थांबायचे व कुठे पळायचे हे विचारांनी नक्की करा यासाठी साधी व नम्र वागणूक ठेवा. व्यवहारात त्या वागणुकीचा उपयोग करा. योग्यवेळी अहंकार सोडा नाही तर प्रपंचात तुमची फसगत होईल नंतर आयुष्यभर एकमेकांत अंतर वाढत जाईल. वयाने मोठे म्हणून शहाणे असे समजु नका योग्य वेळी ज्याचा त्याला मान द्या त्याच्या चांगल्या कामाचे गुण गौरव करा तरच एकमेकांतील दुसरा कमी होईल.
यासाठी कोणत्याही गोष्टीची आसक्ती कितपत ठेवायची व ती केव्हा सोडायची याचा विवेकाने विचार करावा व त्याप्रमाणे वेळेत आचरण ठेवावे म्हणजे प्रपंचात एकोपा होईल अंतर वाढणार नाही. प्रवाहाचे दिशेने वाटचाल करण्याचा विवेक ठेवा. अडचण होईल असे वागु नका तरच प्रपंचात गोडी उत्पन्न होईल. पश्चातापाची पाळी ओढावणार नाही. उरलेल्या आयुष्याचा क्षण नी क्षण आनंदात जगा. आयुष्यात आनंदाचा रंग भरा हे आनंदी जीवन नंतर जगु असे म्हणत बसू नका. कारण नंतर ते अंतर वाढेल. तो आनंद आपल्या हातून जाईल एकदा संधी गेली की ती परत येत नाही हे ध्यानात घ्या. आयुष्य संपल्यावर नंतर म्हणत बसण्यात काय अर्थ आहे. अंतर पडण्यापूर्वी नंतर म्हणायचे सोडून द्या. नाहीतर शेवटी आपल्यालाच कळते बापरे उशीर झाला. म्हणून नंतर वर कांही ठेवू नका. अहंकार हा मोठा शत्रु आहे हे लक्षात ठेवा. त्याला वेळेत हकलून लावा. नाहीतर तो जन्मभर तुम्हाला सोडणार नाही तो निर्माण होण्या आगोदरच त्याला नष्ट करा. नाजुक नात्यांना शेवटी अहंकाराची नाही तर मायेच्या ओलव्याची गरज असते.
एकाद्याने आपल्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टी लक्षात ठेवा व त्याची परत फेड वेळेत करा. स्वत:च्या चुका आठवून त्या सुधारण्याचा प्रयत्न वेळेत करा. अहंकाराने कोणत्याही गोष्टीचे एक घाव दोन तुकडे करु नका कारण तुकडे जोडणे नंतर अवघड जातात.
जगणे म्हणजे फक्त श्वास घेणे नसते तर त्या जगण्याला ही स्वत:चे असे वेगळं रुप आणि अस्तित्व असतं. आयुष्यात कुणाच कुणा वाचून अडत नसतं पण आयुष्यात आलेली चांगली माणसं जेव्हा गैरसमजुतीने दुरावतात तेव्हा मात्र जर ती माणसं आपल्यात राहिली असती तर जगणं अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण झालं असतं. अस मात्र नक्कीच वाटून जातं तेव्हा ते सुंदर करण्यासाठी नंतर करु नंतर करु म्हणत बसू नका क्षण भंगुर जीवन सन्मानाने जगा चांगल्या विचारी सुसंस्कृत माणसांची संगत ठेवा. अहंकारामुळे अशा माणसाचा दुरावा होवू देवू नका. चुकांना योग्यवेळी माफी द्या क्षमा भाव जोपासना.
