मुक्तिचे मार्ग

प्रत्येक गोष्ट साध्य करण्यासाठी कांही मार्ग असतात. यांत पण कांही खुष्कीचे मार्ग असतात. तेव्हा या मार्गाची ओळख आपणाला असावी यासाठी हा प्रयत्न.

प्रपंचाचा जंजाळातून सुटका करुन घेणे म्हणजे मुक्ती प्राप्त करणे होय. पण प्रपंचात आपण इतके अडकलेलो असतो की त्यातून सुटका अशक्यच वाटते. अशा या प्रपंचातून मुक्ती मिळविण्याचे दोन मार्ग सांगितले आहेत.

मुक्तीसाठी
समर्पण करा – विस्मरणाचे
सर्वाचा त्याग करा – ‘स्व’ चा
‘मी’ चा त्याग करा – भक्तीने
स्वत:ला समर्पित करा
स्वत:चा अहंकार, अस्तित्व, वैभव यांचे
विस्मरण होवू द्या यातून तुम्हाला
प्रपंचातून मुक्ती मिळेल.

प्रपंचात काय किंवा परमार्थात काय आपणाला मुक्ती-शांतता-समाधान हवे असेल तर आपणापाशी ‘‘शरण’’ हा मार्ग असणे गरजेचे आहे.

प्रपंचातील संकटांना तोंड देत देत बेजार झालेला माणूस शेवटी परमेश्वराला शरण जातो.

त्या परमेश्वराची सतत आठवण करतो. त्याला परमेश्वर मदत करतो. प्रपंचातून त्याची सही सलामत सुटका करतो.

शरण जाणे हा एक सोपा मार्ग आहे. आपल्या तुटपुंजा सामर्थ्याचा गर्व न करता आपण शरण गेलो तर मुक्ती प्राप्त होईल.

या ठिकाणी पण कुठे शरण जायचे व कुठे प्रयत्नाची शिकस्त करावयाची याचे ज्ञान असणे गरजेचे आहे.

जो माणूस विवेकी असतो त्याचा विवेक जागृत होवून तो कोणत्या मार्गाचा अवलंबा करायचा हे सुचवत असतो त्याप्रमाणे साधकाने मार्गावलंबन केले की तो प्रपंचातून मुक्त होतो.

ही सावधनाता ज्या समर्थ रामदासांनी लग्नाचे मंडपात दाखविली तशी सावधानता साधकाने प्रपंचात दाखवावी व जीवनांत मुक्ती प्राप्त करुन घ्यावी.

सावधानता हा पण मुक्तीचा मार्ग आहे हे ध्यानात ठेवावे.

Leave a comment